शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी दिवस देशभर व्हावा : साताऱ्यातून चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:22 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला.

ठळक मुद्दे केंद्र्रीय सामाजिक मंत्र्यांशी जावळे यांची चर्चा

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन गेल्यावर्षीपासून राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होऊ लागला. आत्ता हा दिवस देशभर साजरा व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे यांनी दिल्लीत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासनस्तरावर साजरा व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे पंधरा वर्षे राज्य सरकारकडे आग्रह धरत होते. त्याला गतवर्षी सरकारने विद्यार्थी दिवस घोषित केला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा होणे आवश्यक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून हा निर्णय झाला पाहिजे, अशी विनंतीही आठवले यांच्याकडे अरुण जावळे यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाने छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल चर्चेत आले आहे. ही शाळा पाहावयास देशाच्या कानाकोपºयातून लोक येतात. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा. यासाठी मंत्रालयाकडे आग्रहही धरला आहे. मुंबई आणि नागपूरमध्ये काही मंत्र्यांशी यासंबंधाने महत्त्वपूर्ण चर्चाही झाली आहे. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन्यात आली आहे.सिम्बॉल आॅफ नॉलेज‘छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हा ऐतिहासिक ठेवा आहे. तो जतन करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शाळेचे विद्यार्थी होत. त्यामुळे या शाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जगात आजपर्यंत सर्वात हुशार विद्यार्थी कोण होऊन गेले, यासंबंधीचे संशोधन झाले. इंग्लंड, अमेरिका येथील कोलंबिया, आॅक्सफर्ड अशा नामवंत विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेतला. हे संशोधन बरेच माहिने सुरू राहिले.

नामवंत विद्यापीठांमधील तज्ज्ञ यामध्ये सक्रियपणे राबत होते. या संशोधनातून एक नंबरसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव पुढे आले. याशिवाय कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यावर ‘सिम्बॉल आॅफ नॉलेज’ असा उल्लेख करण्यात आला आहे,’ अशी माहिती अरुण जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर