शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

महापुरात रुग्ण नदीकाठीच गतप्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:01 IST

रवींद्र माने। लोकमत न्यूज नेटवर्क ढेबेवाडी : नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात संततधार पावसाच्या तडाख्याने ...

रवींद्र माने।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात संततधार पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले. कुठे पूल तुटले, तर कुठे घरे उद्ध्वस्त झाली. एके ठिकाणी वांग नदीकाठची पेटती चिताही पुरातून वाहून गेली.हौदाचीवाडी-जिंती येथील एकाला पुराच्या पाण्याने अडवून ठेवल्याने ओढ्याकाठीच उपचाराविना जीव गमवावा लागला. एकेकाळी गावांचे संरक्षण करणाऱ्या डोंगरांनीही धीर सोडल्याने गुढे आणि उमरकांचन येथील गावकऱ्यांचा प्रवास जीव मुठीत घेऊन चालू आहे.कधी वादळ, कधी भूकंप, कधी पाऊस तर कधी दुष्काळ. अशा विळख्यात सापडलेल्या ढेबेवाडी विभागातील सुमारे साठ गावांसह दोनशेहून अधिक वाड्यावस्त्यांंतील जनता आपला जीवन प्रवास करत आहे. वाल्मिकी पठाराला मिनी महाबळेश्वर म्हणून संबोधले जाते. मात्र यंदा पावसाने हाहाकार माजवल्याने पठारावरील पुलांसह रस्तेही वाहून गेले. येथील जनता संपर्र्कहीन झाली आहे.सलग सोळा दिवस काढणे येथील पूल पाण्याखाली गेल्याने आणि त्यामध्ये हा पूल अर्धा वाहून गेल्याने येथील दळणवळणच थांबले आहे. काढणे परिसरातील शेतकºयांची पावसाने दैना उडविल्याने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाली आहेत.गुढे गावातील बडेकर वस्तीलगत असलेल्या वनविभागाच्या डोंगरकड्यांनी जनतेची झोपच उडवली आहे. वस्तीलगत असलेल्या डोंगरावर भलेमोठे दगड वर्षानुवर्षे वास्तव्य करत आहेत. मात्र यावर्षी झालेल्या पावसाने त्या दगडांचाच मातीचा आधार वाहून गेल्याने आता अनेक वर्षे साथीदार बनून राहिलेले दगड कधी वैर बनतील हे सांगता येत नाही. याठिकाणी नेहमीच वर्दळ असल्याने प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिंती जितकरवाडीतील जनतेने तर आतापर्यंत खूप सहन केले. येथील नजीकच्या ओढ्यावरील पुलाचे स्वप्न यावर्षी पूर्णही झाले. मात्र पहिल्याच पावसात साकव वाहून गेल्याने पुन्हा शिड्यांचा आधार घ्यावा लागला. कुठरे पवारवाडीनजीकचा पूलच वाहून गेल्याने जनतेचे हाल झाले.पंधरा दिवस शाळेला दांडी...विभागात सलग पंधरा दिवस पावसाने हाहाकार माजवला होता. शासनानेही याची दखल घेत शाळांना सहा दिवस सुटी जाहीर केली. मात्र त्यानंतर सुद्धा पूरपरिस्थिती आणि रस्तेच वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना पंधरा दिवस शाळेला दांडी पडली.शंभराहून अधिकघरांची पडझड...ढेबेवाडी विभागात चिखल मातीच्या घरांची संख्या जास्त आहे. यावर्षी झालेल्या अतिपावसाने या घरांच्या भिंतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने शेकडो संसार भर पावसातही उघड्यावर होते.