शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

खंडाळा : सातारा व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण ...

खंडाळा : सातारा व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. वीर धरणातून सुमारे २२,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नीरा नदीतही पाणी वाढू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली.

गेल्या चार दिवसात नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा-देवघर, गुंजवणी या तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरु असल्याने धरण क्षेत्रात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वाढत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक होत असल्याने वीर धरणाच्या विद्युतगृहातून ८०० क्युसेक व दरवाजातून २१,५०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे.

या तिन्ही धरण क्षेत्रांमधील पाणी वीर धरणात पोहोचत असल्याने वीर धरण सुमारे ७० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उचलण्यात आले असून, त्यातून २१,५०५ क्युसेक व विद्युतगृहातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

.....................

२४ खंडाळा

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.