शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

By नितीन काळेल | Updated: August 28, 2023 13:00 IST

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील ...

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील धरणेही पूर्ण भरलेली नाहीत. अशातच सिंचनासाठी पाण्याची मागणी असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणे भरणार कधी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, कण्हेर, तारळी, बलकवडी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे धरण प्रकल्प आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता ही १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच याच धरणातून सिंचनासाठीही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात ही धरणे भरण्याची आवश्यकता असते. तरच तरतुदीनुसार पाणी विसर्ग करताना अडचणी येत नाहीत. मात्र, यंदा जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही अपुरा पाऊस झालेला आहे. त्यातच सध्या बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठाही वाढेना अशी स्थिती आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे पाणी प्रकल्प भरणार का याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणात सध्या ८६.३५ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजेच धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच सध्या धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. सध्या धरण भरले नसतानाच सांगली जिल्हा जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी मागणी झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करण्यात आली आहेत. त्यातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सांगलीतील जलसिंचनासाठी करण्यात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे. त्याचबरोबर इतर धरणातूनही विसर्ग करण्यात येत आहे.जिल्ह्यातील कोयना धरणाबरोबरच धोम, कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही सिंचनासाठी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. सध्या यातील कोयना धरण ८२ टक्के भरलेले आहे. तर धोम धरण ८४ टक्के, कण्हेर ८१.३९ आणि तारळी धरण ९१.६५ टक्के भरलेले आहे. सर्वात कमी पाणीसाठा उरमोडी धरणात ६०.८५ टक्के आहे. हे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तरच उरमोडी यंदा भरणार आहे.

नवजाला ६० मिलीमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरुच आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ६० मिलीमीटरची झाली. त्यानंतर कोयनानगर येथे ४७ आणि महाबळेश्वरला ४० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. नवजाचे पर्जन्यमान पाच हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी