शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

By नितीन काळेल | Updated: August 28, 2023 13:00 IST

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील ...

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील धरणेही पूर्ण भरलेली नाहीत. अशातच सिंचनासाठी पाण्याची मागणी असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणे भरणार कधी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, कण्हेर, तारळी, बलकवडी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे धरण प्रकल्प आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता ही १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच याच धरणातून सिंचनासाठीही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात ही धरणे भरण्याची आवश्यकता असते. तरच तरतुदीनुसार पाणी विसर्ग करताना अडचणी येत नाहीत. मात्र, यंदा जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही अपुरा पाऊस झालेला आहे. त्यातच सध्या बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठाही वाढेना अशी स्थिती आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे पाणी प्रकल्प भरणार का याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणात सध्या ८६.३५ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजेच धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच सध्या धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. सध्या धरण भरले नसतानाच सांगली जिल्हा जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी मागणी झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करण्यात आली आहेत. त्यातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सांगलीतील जलसिंचनासाठी करण्यात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे. त्याचबरोबर इतर धरणातूनही विसर्ग करण्यात येत आहे.जिल्ह्यातील कोयना धरणाबरोबरच धोम, कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही सिंचनासाठी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. सध्या यातील कोयना धरण ८२ टक्के भरलेले आहे. तर धोम धरण ८४ टक्के, कण्हेर ८१.३९ आणि तारळी धरण ९१.६५ टक्के भरलेले आहे. सर्वात कमी पाणीसाठा उरमोडी धरणात ६०.८५ टक्के आहे. हे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तरच उरमोडी यंदा भरणार आहे.

नवजाला ६० मिलीमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरुच आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ६० मिलीमीटरची झाली. त्यानंतर कोयनानगर येथे ४७ आणि महाबळेश्वरला ४० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. नवजाचे पर्जन्यमान पाच हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी