शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

By नितीन काळेल | Updated: August 28, 2023 13:00 IST

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील ...

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील धरणेही पूर्ण भरलेली नाहीत. अशातच सिंचनासाठी पाण्याची मागणी असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणे भरणार कधी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, कण्हेर, तारळी, बलकवडी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे धरण प्रकल्प आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता ही १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच याच धरणातून सिंचनासाठीही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात ही धरणे भरण्याची आवश्यकता असते. तरच तरतुदीनुसार पाणी विसर्ग करताना अडचणी येत नाहीत. मात्र, यंदा जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही अपुरा पाऊस झालेला आहे. त्यातच सध्या बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठाही वाढेना अशी स्थिती आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे पाणी प्रकल्प भरणार का याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणात सध्या ८६.३५ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजेच धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच सध्या धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. सध्या धरण भरले नसतानाच सांगली जिल्हा जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी मागणी झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करण्यात आली आहेत. त्यातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सांगलीतील जलसिंचनासाठी करण्यात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे. त्याचबरोबर इतर धरणातूनही विसर्ग करण्यात येत आहे.जिल्ह्यातील कोयना धरणाबरोबरच धोम, कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही सिंचनासाठी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. सध्या यातील कोयना धरण ८२ टक्के भरलेले आहे. तर धोम धरण ८४ टक्के, कण्हेर ८१.३९ आणि तारळी धरण ९१.६५ टक्के भरलेले आहे. सर्वात कमी पाणीसाठा उरमोडी धरणात ६०.८५ टक्के आहे. हे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तरच उरमोडी यंदा भरणार आहे.

नवजाला ६० मिलीमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरुच आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ६० मिलीमीटरची झाली. त्यानंतर कोयनानगर येथे ४७ आणि महाबळेश्वरला ४० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. नवजाचे पर्जन्यमान पाच हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी