शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Satara: धोम-बलकवडी कालव्याला भगदाड!, लाखो लिटर पाणी वाया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:56 IST

कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता!

खंडाळा : ‘धोम-बलकवडी कालवा खंडाळा तालुक्यातून वाहत असून, अजनुज ते असवलीदरम्यान असणाऱ्या खिंडीत धोम-बलकवडी कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी कलंक पुसण्यासाठी धोम-बलकवडी कालवा जीवनदायी ठरला आहे. सध्या या कालव्याद्वारे पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील विविध ठिकाणची छोटे-मोठे तलाव, बंधारे भरणे शक्य झाले आहे. गेल्या दोन दिवसांत खंडाळा तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. धरणाचे पाणी कालव्यालाही असल्याने हा कालवा भरून वाहत आहे. अजनुज ते असवलीदरम्यान असलेल्या खिंडीतील गेट क्रमांक अकरा जवळील भागात कालवा फुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले आहे. कालव्याला अस्तरीकरण असताना भगदाड पडले, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी या भागातील माळरानातून शिवारात पोहोचले. अनेक ठिकाणी हे पाणी चालू पिकांमध्ये घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कालव्याचे भगदाड तातडीने बंद करून पाण्याचा विसर्ग पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी