शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Satara: धोम-बलकवडी कालव्याला भगदाड!, लाखो लिटर पाणी वाया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:56 IST

कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता!

खंडाळा : ‘धोम-बलकवडी कालवा खंडाळा तालुक्यातून वाहत असून, अजनुज ते असवलीदरम्यान असणाऱ्या खिंडीत धोम-बलकवडी कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी कलंक पुसण्यासाठी धोम-बलकवडी कालवा जीवनदायी ठरला आहे. सध्या या कालव्याद्वारे पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील विविध ठिकाणची छोटे-मोठे तलाव, बंधारे भरणे शक्य झाले आहे. गेल्या दोन दिवसांत खंडाळा तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. धरणाचे पाणी कालव्यालाही असल्याने हा कालवा भरून वाहत आहे. अजनुज ते असवलीदरम्यान असलेल्या खिंडीतील गेट क्रमांक अकरा जवळील भागात कालवा फुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले आहे. कालव्याला अस्तरीकरण असताना भगदाड पडले, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी या भागातील माळरानातून शिवारात पोहोचले. अनेक ठिकाणी हे पाणी चालू पिकांमध्ये घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कालव्याचे भगदाड तातडीने बंद करून पाण्याचा विसर्ग पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी