शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
2
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
3
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
4
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
5
करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS
6
"...तरच संबंध प्रस्थापित करू देईन!"; सोनम रघुवंशीने राजा समोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
7
हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या
8
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
10
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा
11
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
12
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
13
Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?
15
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
16
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
17
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
18
ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
19
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
20
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल

कृषी विभागाचे खरीप नियोजन; साताऱ्यातील शेतकऱ्यांसमोर दुष्काळी सावट 

By नितीन काळेल | Updated: April 24, 2024 18:59 IST

शुक्रवारी खरीपची जिल्हा बैठक: खते अन् बियाणे मुबलक; कमतरता भासणार नाही 

सातारा : पावसाळा तोंडावर आला असून कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी सुमारे ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच खताचेही १ लाख ९ हजार टन आवंटन मंजूर आहे. त्यातील ६३ हजार मेट्रीक टन खत साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास ‘कृषी’ला आहे. या पार्श्वभूमीवर २६ रोजी खरीप बैठक होत असलीतरी शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे सावट आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. यावर्षीच्या खरीपसाठी २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र राहील असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलीतरी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच काही प्रमाणात खते आणि बियाणेही शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर दि. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची खरीप हंगाम आढावा बैठक होत आहे.खरीप हंगामात प्रामुख्याने शेतकऱ्यांना खते आणि बियाणे आवश्यक असतात. पाऊस वेळेत सुरू झाला तर पेरणीही उरकते. पण, गेल्यावर्षी कमी पावसामुळे पेरणी कमी झाली. यंदा खरीपावर दुष्काळाचे सावट असलेतरी कृषी विभागासह शेतकरीही तयारी आहेत. यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यासाठी ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भात, वाटाणा, घेवडा आदी बियाण्यांचा समावेश आहे.यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणं अपेक्षित आहे. तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. सध्या जिल्ह्यात सुमारे १ हजार ७०० क्विंटल बियाणे शिल्लक आहे. त्यामुळे लवकर पेरणी सुरू केलीतरी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. पिकांसाठी खतांची आवश्यकता राहते. यासाठी शासनाने खरीप हंगामाकरीता १ लाख ९ हजार ५०० मेट्रीक टन खतसाठा मंजूर केलेला आहे. सध्या ६३ हजार ९१८ मेट्रीक टन खतसाठा शिल्लक आहे. तसेच मागणीप्रमाणे पुरवठाही होणार आहे. त्यामुळे खताची टंचाईही भासणार नाही, अशी स्थिती आहे.

निवडणुकीची धामधूम सुरू असलीतरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे पूर्ण नियोजन केलेले आहे. लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, भात बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमता चाचणी सुरू करण्यात येणार आहे. आता २६ एप्रिल रोजी खरीपची बैठक होत असून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

पालकमंत्री घेत बैठक..जिल्ह्याची खरीप हंगामाची बैठक हे पालकमंत्री घेत असत. साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यात ही बैठक होत असते. पण, यंदा लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता आहे. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ही बैठक होत आहे.

१२ भारारी पथके करणार कारवाई..दरवर्षीच खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन केली जातात. ही पथके बोगस खते, बियाणेप्रकरणी कारवाई करतात. आताही कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशी मिळून १२ पथके स्थापन केली आहेत. त्यांचे लक्ष बोगस खते, बियाणे विक्री, भेसळ यावर असणार आहे.

जिल्ह्यात जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत आहे. यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. दि. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम बैठक होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांची कमतरता भासणार नाही. सध्या काही साठाही शिल्लक आहे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र