शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
4
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
5
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
6
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
7
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
9
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
10
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
11
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
12
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
13
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
14
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
15
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
16
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
17
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
18
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
19
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
Daily Top 2Weekly Top 5

Satara- ग्राऊंड रिपोर्ट: मृत्यूच्या काठावरुन धोकादायक प्रवास, उड्डाणपुलांवरच महामार्ग तोडला 

By संजय पाटील | Updated: May 29, 2025 18:01 IST

वाहने कोसळण्याची भिती; अपघात वाढले

संजय पाटीलकऱ्हाड : सहापदरीच्या रेट्यात महामार्गासह उपमार्गाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. उंब्रजपासून कऱ्हाडपर्यंतचे उपमार्गही सहापदरीने पूर्णपणे गिळलेत. त्यातच उड्डाणपुलावर महामार्ग तोडण्यात आल्याने वाहनधारकांचा मृत्युच्या काठावरुन धोकादायक प्रवास सुरू आहे. चालकाचा फुटभर अंदाज चुकला तरी वाहन थेट खाली कोसळण्याची शक्यता असून ठिकठिकाणी अशी परिस्थिती आहे.उंब्रज ते कऱ्हाड हे अंतर सरासरी सतरा किलोमीटरचे. मात्र, या अंतरात पंधरापेक्षा जास्त ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. ठीकठिकाणी महामार्ग तोडला गेला आहे. नवीन महामार्ग, उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजलेत. त्याबरोबरच सुरक्षात्मक उपाययोजना नसल्यामुळे अपघातांचे प्रमाणही कित्येक पटींनी वाढले आहे. काही ठिकाणी केवळ दगड उभे करून सुरक्षिततेचा दिखावा केला गेला आहे. तर काही ठिकाणी दोन-दोन फुटांचे खांब उभे करून हास्यास्पद सुरक्षा व्यवस्था उभारली गेली आहे.सहापदरीसाठी ठिकठिकाणचे उपमार्ग महामार्गाला जोडले गेले आहेत. त्यामुळे  स्थानिकांची रहदारी महामार्गावरूनच सुरू आहे. काही ठिकाणी नवीन उपमार्गासाठी खोदकाम केले आहे. मात्र तेही अर्धवट सोडण्यात आल्यामुळे खोदलेल्या खड्ड्यात पाण्याचे डोह साचले आहेत. परिणामी त्यामध्ये पडून एखाद्याचा जीव जाण्याची अथवा वाहन कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वळण मार्गांमुळे डोकेदुखीउंब्रजपासून कऱ्हाडपर्यंत काही ठिकाणी सहापदरीच्या कामामुळे वळण मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्याबरोबरच स्थानिक वाहतुकीसाठीही उपमार्गावर वळण मार्ग बनविण्यात आले आहेत. मात्र, हे मार्ग अपघाताचे कारण बनत आहेत.

कुठून जायचं तेच कळेना!वाहनाला गती आली की समोर ‘डायव्हर्शन’चा फलक दिसतो. उपमार्गावर वाहन घातले की अरुंद रस्ता सुरू होतो. आणि उपमार्ग संपताच पुन्हा वळण घेऊन महामार्गावर जावे लागते. त्यामुळे या सर्कशीत नेमकं जायचं कुठून, हेच चालकांना कळेनासे होते.

उघड्या गटरचा धोका जास्तमहामार्ग आणि उपमार्गाच्या मध्यभागी आठ ते दहा फूट खोलीची गटर खोदण्यात आली आहेत. काही ठिकाणी त्याचे बांधकाम केले आहे. तर काही ठिकाणी ती तशीच सोडली आहेत. त्या गटारीमध्ये पाणी साचले असून चालकाचा ताबा सुटला तर वाहने थेट गटारात कोसळण्याची भीती आहे.

तीन पदरी लेन अचानक संपते तेव्हा..उंब्रजपासून कऱ्हाडपर्यंत महामार्गावर काही ठिकाणी तीन लेन बनविल्या आहेत. लेनचे काम पूर्ण झाल्यामुळे चालक भरधाव वाहने चालवितात. मात्र, काही अंतरावरच एका लेनचे काम अर्धवट सोडलेले असल्याने चालकाला वाहन नियंत्रित करताना कसरत करावी लागते. वाहन नियंत्रित झाले तर ठीक अन्यथा पुढे जाऊन वाहन खड्ड्यात आदळते.

तासवडेत महामार्गाची एक बाजु उद्ध्वस्ततासवडे येथे जुन्या टोलनाक्याच्या जागेवर महामार्गाची एक बाजू पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून एकाच लेनवरुन दुहेरी वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग