शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

नुकसानीच्या पंचनाम्याची कामे मिशन मोडवर-- प्रशासन शेताच्या बांधावर;अतिवृष्टीबाधित क्षेत्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:08 IST

महापुरामुळे सातारा, जावळी, पाटण व क-हाड तालुक्यात नुकसान झाले. मागील महिन्यापासून परतीच्या पावसामुळे वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण, खटाव आदी तालुक्यांत खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षाच्या फळबागा आणि भाजीपाला आदींचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर मागील चार दिवसांपासून मिशन मोडवर पंचनाम्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद--स्ट्रॉबेरीची रोपे कुजली शेतीसह मातीही गेली वाहून रब्बी हंगामाची पेरणी रखडली भात अन् सोयाबीन वायानुकसानीच्या पंचनाम्याची कामे मिशन मोडवर शेतक-यांना अश्रू अनावर

स्वप्नील शिंदे ।सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. झालेल्या पीकहानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी शेतकºयाच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करीत आहेत. आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगा फुटल्याने दाण्याने अंकुर फुटले आहेत. अनेक ठिकाणी भात भिजल्याने काळे पडले असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच द्राक्ष व डाळिंब बागांनाही तडाखा बसला आहे. द्राक्षांचे घड फुटले असून, डाळिंबाची फूलगळती झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने आले व हळद पिकात कंदकुज वाढू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी विभागाच्यावतीने युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळी अधिकारी व कर्मचारी शेत शिवारात साचलेल्या पाण्याचे डबके व चिखलातून वाट काढत बांधावर जाऊन शेतीची पाहणी करीत आहेत. त्यांनी शेतकºयांशी संवाद साधला असता नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, अशी विनवणी करीत आहेत.

सातारा, जावळी, पाटण तालुक्यातील हात तोंडाशी आलेला भात पाण्यात गेला आहे. ज्या दिवशी भाताची कापणी त्याच दिवशी पडलेल्या पावसामुळे शेतात भिजत पडला आहे. सोयाबीनच्या शेंगा फुटून त्यांना अंकुर आल्याने आहेत. तर काही ठिकाणी सोयाबीन काळे पडले असून, बाजारात त्याची खरेदी केली जात नाही. खंडाळा, फलटण, माणमधील शेतात पाणी साचून राहिल्याने उसाच्या कांडीला कोंब फुटले आहेत. वाई, कोरेगाव परिसरातील फुले व भाजीपाला कुजून गेला आहे. मात्र, त्याची सातबारावर नोंद नसल्याने त्यांचा पंचनामा करून भरपाई मिळणे अवघड झाले आहे. त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात आला आहे. ऐन रब्बीच्या हंगामात पीक वाया गेल्याने पुढील खर्च कसा उभा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. हातात पैसे नसल्याने रब्बीची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदी पिके मातीमोल झाली आहेत. तर माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील बाजरी, घेवडा आदी पिके पाण्यात गेली.पूर्व भागातील खंडाळा, फलटण, माण व खटाव तालुक्यातील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. पोटच्या पोरासारख्या सांभाळलेल्या बागांमध्ये चार-चार दिवस पाणी साचून राहिल्याने त्यांनी माना टाकल्या आहेत. अधिकारी जेव्हा पंचनामा करताना फोटो काढण्यासाठी शेतात उभे राहण्यास सांगतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.असा केला जातोय पंचनामामहसूल व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतात जातात. त्या ठिकाणी ज्या शेतकºयांनी पिकविमा काढला आहे, त्या शेतकºयांचा नुकसान झालेल्या पिकासह फोटो काढला जात आहे. तसेच पंचनाम्यांचा फॉर्म भरून घेतला जात आहे. शेतकºयांना कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ३०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, फळ व बहुवार्षिक पिकांसाठी १७ हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे.वाई तालुक्यातील वेळे व गुळुंब येथे गाव कामगार तलाठी, कृषी सहायक, कोतवाल, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा केला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर