शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नुकसान गाडीभर...मदत चिमूटभर! -: शेतकरी आणखी गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 11:39 IST

सागर गुजर सातारा : अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे अक्षरश: कंबरडे मोडले. हंगामी पिकांसह नगदी पिके मातीमोल झाली. ...

ठळक मुद्देहेक्टरी ८ हजारांची मदत हास्यास्पद; ६४.५८ लाखांचे नुकसान शासनाकडून मिळाले १७ कोटी

सागर गुजरसातारा : अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे अक्षरश: कंबरडे मोडले. हंगामी पिकांसह नगदी पिके मातीमोल झाली. या परिस्थितीत शासनाने शेतकºयांना सावरण्याचा निर्णय घ्यायला हवा होता.  याउलट शासनाने शेतकºयांची चेष्टाच केली आहे. ‘नुकसान गाडीभर...मदत चिमूटभर,’ असं म्हणण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे.

अति पावसामुळे जिल्ह्यामधील ऊस, आले, हळद, सोयाबीन, डाळिंब, इतर फळबागा तसेच फळभाज्या मातीमोल झाल्या. खरीप हंगामातील पिके तर मातीमोल झाली. हातातोेंडाशी आलेले सोयाबीनचे पीक वाया गेल्याने ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ शेतकºयांवर आली. जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ४६६ शेतकºयांचे एकूण ६१ हजार ७0 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ६४ कोटी ५४ लाख २३ हजार रुपयांचे नुकसान झाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी नगदी पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याव्यतिरिक्त हंगामी पिकांसाठी जाहीर केलेली मदतही नगण्य अशी आहे.

जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, जावली, कºहाड, पाटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, माण, खटाव या सर्वच ११ तालुक्यांमध्ये नुकसान झाले आहे. जिल्ह्यात प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार ६४ कोटी ५४ लाख रुपये इतके शेतीपिकांचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून जिल्ह्यातला १७ कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली, ही मदत जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तहसीलदारांकडे वर्ग केली आहे. ही पहिल्या टप्प्यातील मदत आहे, यानंतरही शासनाकडून मदत येईल, असे सांगीतले जाते. त्यातच राज्यामध्ये कुठल्याच पक्षाचे सरकार अस्तित्वात नसल्याने शेतकºयांसाठी मागणीचा रेटा कोण करणार? हा प्रश्न आहे.

निवडणुकीच्या काळात सर्वच पक्षांनी शेतकºयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र मदतीसाठी कुणीही अद्याप पुढे आलेले नाही. सत्तेच्या सारिपाटाचा खेळ दिवस-रात्र सुरु असताना शासनाकडून काही मिळेल, याची खात्री नसल्याने शेतकºयांनी हातावर हात धरुन बसण्यापेक्षा तेच हात औताला लावून रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत करुन पेरणी सुरु केल्या आहेत. पीक वाया गेले तरी  पेरणीसाठी आर्थिक जुळणी करण्याची शेतकºयांसाठी सवयीची बाब असते. कष्टाने पिकवलेल्या सोयाबीनला योग्य दर मिळण्यासाठी ना सरकारने जबाबदारी घेतली. ना आता शेतातच सोयाबीनच्या शेंगाना फुटवे फुटल्याने सरकारने त्याची दखल घेतली. आपलं जगणं अन मरणं...हे स्वत:च्या हिमतीवर पेलणाºया बळीराजाने पुन्हा कामातच ‘राम’ शोधला आहे, एवढं मात्र नक्की!खर्च लाखांत...मदत शेकड्यात!आले, ऊस, कांदा, हळद आदी पिकांचा उत्पादन खर्च एकरी लाखांच्या घरात आहे. एक एकरात आले पीक घ्यायचे असेल तर त्यासाठी ८0 हजार रुपयांचे बियाणे लागते. मशागतीसाठी १0 हजार, ठिबक सिंचनासाठी १0 हजार, खते १५ हजार तर लागवड खर्च ४ हजार व इतर किरकोळ खर्च वेगळाच असतो. आले पीक घ्यायचे म्हटल्यास एकरी १ लाख २५ हजार रुपयांचा खर्च येतो. शासनाच्या मदतीच्या घोषणेनुसार गुंठ्याला ८0 रुपये म्हणजे एकरी ३ हजार २00 रुपये मदत मिळेल. खर्च आणि झालेल्या नुकसानीची मदत यातील तफावत शासन कधी लक्षात घेणार हा प्रश्न आहे. 

सत्तास्थापन्याच्या खेळासाठी ज्या पध्दतीने शासनाचा कारभार दिवस-रात्र सुरु असतो. त्याच पध्दतीने जर नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत करण्याचे शासनाने मनावर घेतले असते तर शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहिला नसता. प्रत्येक पक्षांकडे किसान मोर्चा आहे, तो केवळ शेतकºयांची मते मिळविण्यासाठी आहे, असंच समोर येतं.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :floodपूरGovernmentसरकारMONEYपैसाFarmerशेतकरी