शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
5
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
6
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
7
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
8
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
9
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
10
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
11
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
12
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
13
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
14
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
15
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
16
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
17
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
18
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
19
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
20
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ

दहिवडी आगाराचे ढिसाळ नियोजन, एसटी बस वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांची अंधारातून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:39 PM

दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एसटी वेळेत सोडण्याची मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.

ठळक मुद्देपालकांची वाढली चिंता दहिवडी आगाराच्या नियोजनाबाबत नाराजी

पळशी (सातारा) : दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एसटी वेळेत सोडण्याची मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.पळशी तसेच वाड्यावस्त्यांवरून दहिवडी येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी जातात. गोंदवले, लोधवडे, पळशी येथील विद्यार्थ्यांच्या सततच्या होणा ऱ्यां वादावादीमुळे दहिवडी-पळशी एसटीची वेळ काही महिन्यांपूर्वी एक तास वाढवून सायंकाळी साडेपाच अशी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन विभागाकडून उपाययोजना करण्यात आली असली तरी दुसरीकडे मात्र बस वेळेवर सोडली जात नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

सायंकाळी साडेपाच अशी वेळ असताना दहिवडी-पळशी बस कधी सहा तर कधी साडेसहा वाजता बसस्थानकातून मार्गस्थ होते. गावात बस उशिरा पोहोचल्याने पळशीसह वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या मुला-मुलींना अंधारात वाट शोधत घरी जावे लागत आहे. आगार प्रमुखांनी विद्यार्थ्यांना येणाºया अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन दहिवडी-पळशी बस वेळेत सोडावी, अशी मागणी होत आहे.

 

दहिवडी-पळशी एसटी गावात वेळेत पोहोचत नाही. विद्यार्थ्यांना घरी अंधारतच चालत जावे लागत आहे. एसटी वेळेत सोडण्याबाबत आगार प्रमुखांना वेळोवेळी फोन केले आहेत. मात्र, अद्याप दखल घेतली नसून परिवहन मंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहे.- विष्णू खाडेतालुका उपाध्यक्ष, भाजप 

साडेपाचची वेळ असलेली एसटी कधी सहा तर कधी साडेसहाला सुटत असते. त्यामुळे गावात येईपर्यंत पूर्ण अंधार झालेला असतो. बस वेळेत सोडली तर आम्ही लवकर घरी पोहोचू .- विशाल नाकाडेविद्यार्थी, पळशी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर