शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

जैविक खताद्वारे माळरानावर सीताफळ बाग फुलवत मिळवले भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:32 IST

यशकथा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.

- संतोष धुमाळ ( सातारा) 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोनके येथील प्रयोगशील शेतकरी भिकू धुमाळ. त्यांनी आपल्या माळरानावर जैविक खताचा वापर करून सीताफळाची बाग फुलविली आहे. तसेच यामध्ये घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. 

अलीकडील काळात पावसाची अनिश्चितता वाढली आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून, शेतकीचे अर्थशास्त्र बिघडले आहे. तोट्यातील शेती, मजुरांचा तुटवडा, पिकांवरील रोगराई आदी कारणांमुळे शेती क्षेत्रात गंभीर परिणाम होत आहेत. मुंबई येथील नोकरीतून सेवानिवृत्ती घेऊन सातारा जिल्ह्यातील भिकू धुमाळ यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. जून २०१६ मध्ये त्यांनी वाठार स्टेशनचे कृषी सहायक तानाजी काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या फळ पीक लागवड योजनेंतर्गत आपल्या ६० गुंठे क्षेत्रावर बाळानगरी या जातीच्या जवळपास २०० झाडांचे नियोजन केले. यात ५, ७, ५ मीटर अंतरावर खड्डे काढून त्यात शेण व जैविक खतांचा भरणा केला. तत्पूर्वी त्यांनी बागेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शेतात कूपनलिका खोदली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय करून सीताफळाची लागवड केली.

ही बाग पूर्णत: जैविक खतांवर जोपासण्याचा त्यांनी संकल्प केला. यासाठी लागवडीनंतर जीवामृत व इतर जैविक खते त्यांनी स्वत:च शेतात बनविली. यामुळे त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचला. लागवडीनंतर एक ते दीड वर्षाच्या कालावधीनंतर झाडांची छाटणी करून घेतली. 

झाडे लावल्यापासून आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रातून घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. गतवर्षीच्या हंगामात पहिलाच बहर असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नसले तरी चांगल्या दरामुळे इतर पिकांच्या तुलनेत सीताफळ पीक अधिक फायद्याचे ठरले. शाश्वत उत्पादन व आजाराला बळी न पडणारे फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताफळाची सध्या परिसरात लागवड होत असून, डाळिंब व द्राक्षबाग पिकविणारा भाग आता सीताफळ उत्पादनातही आपली ओळख निर्माण करीत आहे. 

इतर फळबागांच्या तुलनेत सीताफळाचा भांडवली खर्च कमी आहे. सीताफळ हे कोणत्याही रोगाला बळी पडत नसल्याने त्यावर औषधाचा खर्चदेखील अगदीच नगण्य असतो. याउलट ऐन हंगामात देखील सीताफळाला किमान बाजारभाव ७० ते १५० रुपये प्रति किलो असा मिळतो. अल्पावधीतच आपली चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ टिकविणाऱ्या या फळाला नागरिकांकडून मागणी वाढली आहे. रबडी, आइस्क्रीमसारख्या पदार्थांमध्ये सीताफळाचा वापर होत असल्याने सीताफळाची मागणी वाढल्याची माहिती शेतकरी भिकू धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी