शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

जैविक खताद्वारे माळरानावर सीताफळ बाग फुलवत मिळवले भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:32 IST

यशकथा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.

- संतोष धुमाळ ( सातारा) 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोनके येथील प्रयोगशील शेतकरी भिकू धुमाळ. त्यांनी आपल्या माळरानावर जैविक खताचा वापर करून सीताफळाची बाग फुलविली आहे. तसेच यामध्ये घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. 

अलीकडील काळात पावसाची अनिश्चितता वाढली आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून, शेतकीचे अर्थशास्त्र बिघडले आहे. तोट्यातील शेती, मजुरांचा तुटवडा, पिकांवरील रोगराई आदी कारणांमुळे शेती क्षेत्रात गंभीर परिणाम होत आहेत. मुंबई येथील नोकरीतून सेवानिवृत्ती घेऊन सातारा जिल्ह्यातील भिकू धुमाळ यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. जून २०१६ मध्ये त्यांनी वाठार स्टेशनचे कृषी सहायक तानाजी काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या फळ पीक लागवड योजनेंतर्गत आपल्या ६० गुंठे क्षेत्रावर बाळानगरी या जातीच्या जवळपास २०० झाडांचे नियोजन केले. यात ५, ७, ५ मीटर अंतरावर खड्डे काढून त्यात शेण व जैविक खतांचा भरणा केला. तत्पूर्वी त्यांनी बागेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शेतात कूपनलिका खोदली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय करून सीताफळाची लागवड केली.

ही बाग पूर्णत: जैविक खतांवर जोपासण्याचा त्यांनी संकल्प केला. यासाठी लागवडीनंतर जीवामृत व इतर जैविक खते त्यांनी स्वत:च शेतात बनविली. यामुळे त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचला. लागवडीनंतर एक ते दीड वर्षाच्या कालावधीनंतर झाडांची छाटणी करून घेतली. 

झाडे लावल्यापासून आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रातून घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. गतवर्षीच्या हंगामात पहिलाच बहर असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नसले तरी चांगल्या दरामुळे इतर पिकांच्या तुलनेत सीताफळ पीक अधिक फायद्याचे ठरले. शाश्वत उत्पादन व आजाराला बळी न पडणारे फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताफळाची सध्या परिसरात लागवड होत असून, डाळिंब व द्राक्षबाग पिकविणारा भाग आता सीताफळ उत्पादनातही आपली ओळख निर्माण करीत आहे. 

इतर फळबागांच्या तुलनेत सीताफळाचा भांडवली खर्च कमी आहे. सीताफळ हे कोणत्याही रोगाला बळी पडत नसल्याने त्यावर औषधाचा खर्चदेखील अगदीच नगण्य असतो. याउलट ऐन हंगामात देखील सीताफळाला किमान बाजारभाव ७० ते १५० रुपये प्रति किलो असा मिळतो. अल्पावधीतच आपली चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ टिकविणाऱ्या या फळाला नागरिकांकडून मागणी वाढली आहे. रबडी, आइस्क्रीमसारख्या पदार्थांमध्ये सीताफळाचा वापर होत असल्याने सीताफळाची मागणी वाढल्याची माहिती शेतकरी भिकू धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी