शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

जैविक खताद्वारे माळरानावर सीताफळ बाग फुलवत मिळवले भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:32 IST

यशकथा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.

- संतोष धुमाळ ( सातारा) 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोनके येथील प्रयोगशील शेतकरी भिकू धुमाळ. त्यांनी आपल्या माळरानावर जैविक खताचा वापर करून सीताफळाची बाग फुलविली आहे. तसेच यामध्ये घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. 

अलीकडील काळात पावसाची अनिश्चितता वाढली आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून, शेतकीचे अर्थशास्त्र बिघडले आहे. तोट्यातील शेती, मजुरांचा तुटवडा, पिकांवरील रोगराई आदी कारणांमुळे शेती क्षेत्रात गंभीर परिणाम होत आहेत. मुंबई येथील नोकरीतून सेवानिवृत्ती घेऊन सातारा जिल्ह्यातील भिकू धुमाळ यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. जून २०१६ मध्ये त्यांनी वाठार स्टेशनचे कृषी सहायक तानाजी काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या फळ पीक लागवड योजनेंतर्गत आपल्या ६० गुंठे क्षेत्रावर बाळानगरी या जातीच्या जवळपास २०० झाडांचे नियोजन केले. यात ५, ७, ५ मीटर अंतरावर खड्डे काढून त्यात शेण व जैविक खतांचा भरणा केला. तत्पूर्वी त्यांनी बागेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शेतात कूपनलिका खोदली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय करून सीताफळाची लागवड केली.

ही बाग पूर्णत: जैविक खतांवर जोपासण्याचा त्यांनी संकल्प केला. यासाठी लागवडीनंतर जीवामृत व इतर जैविक खते त्यांनी स्वत:च शेतात बनविली. यामुळे त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचला. लागवडीनंतर एक ते दीड वर्षाच्या कालावधीनंतर झाडांची छाटणी करून घेतली. 

झाडे लावल्यापासून आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रातून घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. गतवर्षीच्या हंगामात पहिलाच बहर असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नसले तरी चांगल्या दरामुळे इतर पिकांच्या तुलनेत सीताफळ पीक अधिक फायद्याचे ठरले. शाश्वत उत्पादन व आजाराला बळी न पडणारे फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताफळाची सध्या परिसरात लागवड होत असून, डाळिंब व द्राक्षबाग पिकविणारा भाग आता सीताफळ उत्पादनातही आपली ओळख निर्माण करीत आहे. 

इतर फळबागांच्या तुलनेत सीताफळाचा भांडवली खर्च कमी आहे. सीताफळ हे कोणत्याही रोगाला बळी पडत नसल्याने त्यावर औषधाचा खर्चदेखील अगदीच नगण्य असतो. याउलट ऐन हंगामात देखील सीताफळाला किमान बाजारभाव ७० ते १५० रुपये प्रति किलो असा मिळतो. अल्पावधीतच आपली चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ टिकविणाऱ्या या फळाला नागरिकांकडून मागणी वाढली आहे. रबडी, आइस्क्रीमसारख्या पदार्थांमध्ये सीताफळाचा वापर होत असल्याने सीताफळाची मागणी वाढल्याची माहिती शेतकरी भिकू धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी