शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:27 IST

सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने

सातारा : सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सातारा जिल्ह्यामध्ये शासन व प्रशासन एकत्र मिळून येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी अपयशीच ठरल्याचे दिसत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यात कोवीड रुग्णांना कोणी बेड देता का बेड यासाठी संपूर्ण जिल्ह्यात फिरावे लागत आहे, रुग्णांला उपचाराविना आपला जीव सोडावा लागत आहे.याला जबाबदार कोण.सातारा जिल्ह्यात आहे त्यामध्ये तालुकानिहाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालये आहेत, तसेच सर्व सुविधायुक्त खासगी होस्पीटल्स आहेत. इतकी व्यवस्था असताना फक्त जनतेला चांगली आरोग्य व्यवस्था देनेकरीता नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापनाखाली ईमर्जन्सी लागू करून सर्व खाजगी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये वेळीच सर्वची सर्व अधीग्रहीत करून लोकडाऊन काळातच सर्व सोईनीयुक्त बेडची व्यवस्था केली असती तर आजची ही वाईट परिस्थीती आलीच नसती.

आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्याच्या भुभागाचा विचार करता पाच कोविड सेंटर ऊभे करण्याची मागणी केली होती, याचा विचार केला असता तर आज ही वेळच आली नसती.कोविड परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनात कारभारी कोण पाहिजे हेच जनतेला कळत नाही. जिल्हाधिकारी फक्त बाधित रुग्ण आणी बरे झालेल्या रुग्णांचे रोजच्या रोज आकडे जाहीर करतात, पण रोज किती बेड निर्माण केले, याची मात्र माहिती देत नाहीत.

ॲम्बुलन्स उपलब्ध होत नाहीत. आपत्ती व्यवस्थापनला फोन केल्यास वेगवेगळे फोन नंबर देऊन फोन करण्यास सांगतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला एकाच ठिकाणाहून योग्य माहिती मिळत नसल्याने रुग्णाला घेऊन फिरावे लागत आसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत.कोविड रुग्णांना एकाच ठिकाणाहून सर्व माहिती देऊन रुग्णांला उपचारासाठी घेऊन जावे. होम आयसोलेशनचा पर्याय रद्द करण्यात यावा, सर्वांना वेळेत उपचार मिळाल्यास कोविड संकट येऊ शकतो. त्यासाठी फक्त घोषना करता प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी यावेळी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSatara areaसातारा परिसर