शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:27 IST

सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने

सातारा : सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सातारा जिल्ह्यामध्ये शासन व प्रशासन एकत्र मिळून येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी अपयशीच ठरल्याचे दिसत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यात कोवीड रुग्णांना कोणी बेड देता का बेड यासाठी संपूर्ण जिल्ह्यात फिरावे लागत आहे, रुग्णांला उपचाराविना आपला जीव सोडावा लागत आहे.याला जबाबदार कोण.सातारा जिल्ह्यात आहे त्यामध्ये तालुकानिहाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालये आहेत, तसेच सर्व सुविधायुक्त खासगी होस्पीटल्स आहेत. इतकी व्यवस्था असताना फक्त जनतेला चांगली आरोग्य व्यवस्था देनेकरीता नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापनाखाली ईमर्जन्सी लागू करून सर्व खाजगी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये वेळीच सर्वची सर्व अधीग्रहीत करून लोकडाऊन काळातच सर्व सोईनीयुक्त बेडची व्यवस्था केली असती तर आजची ही वाईट परिस्थीती आलीच नसती.

आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्याच्या भुभागाचा विचार करता पाच कोविड सेंटर ऊभे करण्याची मागणी केली होती, याचा विचार केला असता तर आज ही वेळच आली नसती.कोविड परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनात कारभारी कोण पाहिजे हेच जनतेला कळत नाही. जिल्हाधिकारी फक्त बाधित रुग्ण आणी बरे झालेल्या रुग्णांचे रोजच्या रोज आकडे जाहीर करतात, पण रोज किती बेड निर्माण केले, याची मात्र माहिती देत नाहीत.

ॲम्बुलन्स उपलब्ध होत नाहीत. आपत्ती व्यवस्थापनला फोन केल्यास वेगवेगळे फोन नंबर देऊन फोन करण्यास सांगतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला एकाच ठिकाणाहून योग्य माहिती मिळत नसल्याने रुग्णाला घेऊन फिरावे लागत आसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत.कोविड रुग्णांना एकाच ठिकाणाहून सर्व माहिती देऊन रुग्णांला उपचारासाठी घेऊन जावे. होम आयसोलेशनचा पर्याय रद्द करण्यात यावा, सर्वांना वेळेत उपचार मिळाल्यास कोविड संकट येऊ शकतो. त्यासाठी फक्त घोषना करता प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी यावेळी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSatara areaसातारा परिसर