शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

गळती काढलेल्या तलावात ऊन्हाळ्याच्या तोंडावर ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची गळती काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. हे काम निकृष्ठ ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची गळती काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. हे काम निकृष्ठ दर्जाचे झालेले असतानाही त्याच ठेकेदाराला कारंडेवाडी येथील तलाव गळती दुरूस्तीचे काम देण्यात आले आहे. यामुळे संबधित विभागाच्या भूमिकेविषयी ग्रामस्थांमधून शंका उपस्थित केली जात आहे.

बामणवाडी येथील पाझर तलावाचे १२ लाख रुपये इतका निधी खर्च करून गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी पेपरचा वापर करण्यात आला. तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूला चर खोदून हा पेपर टाकण्यात आला होता. त्यावेळी संबधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, तलावात पाणीसाठा जास्त दिवस टिकला नाही. दुरूस्तीनंतरही पहिल्यापेक्षा दुपटीने गळती वाढल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात आला.

बामणवाडी ग्रामपंचायतींतर्गत २०१९मध्ये जून - जुलै महिन्यात कारंडेवाडी येथे लघुपाटबंधारे विभागाकडून सुमारे २५ लाख रुपये खर्चाचा पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावाला सुरूवातीपासूनच मुख्य भिंतीच्या खालून मोठी गळती असल्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत होता. परिणामी या तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली. या मागणीनुसार तलाव दुरूस्तीसाठी अकरा लाख रुपये निधी मंजूर झाला असून, दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र, बामणवाडी येथील तलावाची गळती दुरुस्ती ज्या नवीन तंत्रज्ञानाने काढण्यात आली, त्याच तंत्रज्ञानाद्वारे एचडीपी पेपर वापरून येथील गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. मात्र, कितपत गळती काढण्यास यश येईल, हे वेळच ठरवेल.

- चौकट

काम करतं कोण?

कुसूर परिसरातील एका पदाधिकाऱ्याचे ठेकेदाराशी सलोख्याचे संबंध आहेत. परिणामी, संबंधित काम त्या ठेकेदाराचे आहे का त्याचे नावे अन्य कोणी करत आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे.

- चौकट

पाण्याअभावी विहिरीत ठणठणाट

कुसूर विभागातील संपूर्ण भाग कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना शेतजमीन ओलिताखाली घेण्यासाठी नदी किंवा अन्य शासनाची कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी काढल्या आहेत. परंतु, पाण्याअभावी विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पाझर तलाव निर्मितीमुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन विहिरीत पाणीसाठा होण्यास मदत होते.

- चौकट

पाच वाड्यांचा पाणीप्रश्न सुटेल

शिबेवाडी आणि कारंडेवाडी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर तलावापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर बामणवाडी, खड्याचीवाडी आणि चाळकेवाडीला पाणीपुरवठा करणारी विहीर तलावापासून काही अंतरावर आहे. तलावात बारमाही पाणीसाठा झाल्यास पाच वाड्यांचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार आहे.