शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

गळती काढलेल्या तलावात ऊन्हाळ्याच्या तोंडावर ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची गळती काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. हे काम निकृष्ठ ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची गळती काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. हे काम निकृष्ठ दर्जाचे झालेले असतानाही त्याच ठेकेदाराला कारंडेवाडी येथील तलाव गळती दुरूस्तीचे काम देण्यात आले आहे. यामुळे संबधित विभागाच्या भूमिकेविषयी ग्रामस्थांमधून शंका उपस्थित केली जात आहे.

बामणवाडी येथील पाझर तलावाचे १२ लाख रुपये इतका निधी खर्च करून गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी पेपरचा वापर करण्यात आला. तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूला चर खोदून हा पेपर टाकण्यात आला होता. त्यावेळी संबधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, तलावात पाणीसाठा जास्त दिवस टिकला नाही. दुरूस्तीनंतरही पहिल्यापेक्षा दुपटीने गळती वाढल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात आला.

बामणवाडी ग्रामपंचायतींतर्गत २०१९मध्ये जून - जुलै महिन्यात कारंडेवाडी येथे लघुपाटबंधारे विभागाकडून सुमारे २५ लाख रुपये खर्चाचा पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावाला सुरूवातीपासूनच मुख्य भिंतीच्या खालून मोठी गळती असल्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत होता. परिणामी या तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली. या मागणीनुसार तलाव दुरूस्तीसाठी अकरा लाख रुपये निधी मंजूर झाला असून, दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र, बामणवाडी येथील तलावाची गळती दुरुस्ती ज्या नवीन तंत्रज्ञानाने काढण्यात आली, त्याच तंत्रज्ञानाद्वारे एचडीपी पेपर वापरून येथील गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. मात्र, कितपत गळती काढण्यास यश येईल, हे वेळच ठरवेल.

- चौकट

काम करतं कोण?

कुसूर परिसरातील एका पदाधिकाऱ्याचे ठेकेदाराशी सलोख्याचे संबंध आहेत. परिणामी, संबंधित काम त्या ठेकेदाराचे आहे का त्याचे नावे अन्य कोणी करत आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे.

- चौकट

पाण्याअभावी विहिरीत ठणठणाट

कुसूर विभागातील संपूर्ण भाग कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना शेतजमीन ओलिताखाली घेण्यासाठी नदी किंवा अन्य शासनाची कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी काढल्या आहेत. परंतु, पाण्याअभावी विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पाझर तलाव निर्मितीमुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन विहिरीत पाणीसाठा होण्यास मदत होते.

- चौकट

पाच वाड्यांचा पाणीप्रश्न सुटेल

शिबेवाडी आणि कारंडेवाडी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर तलावापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर बामणवाडी, खड्याचीवाडी आणि चाळकेवाडीला पाणीपुरवठा करणारी विहीर तलावापासून काही अंतरावर आहे. तलावात बारमाही पाणीसाठा झाल्यास पाच वाड्यांचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार आहे.