शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कॉँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीतून सरकारला सळो की पळो करू : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:52 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते,

ठळक मुद्देवडगाव हवेलीत विश्वजित कदम यांचा सत्कार

वडगाव हवेली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते, तर भाजपला सत्ता अशक्य होती. काँगे्रस विचाराचे सर्वजण एकत्र आलो तर केंद्र व राज्यातील सरकारला सळो की पळो करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे आमदार विश्वजित कदम यांची विधानसभेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनील पाटील, कºहाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, शिवराज मोरे, राजेंद्र्र चव्हाण, मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, प्रतापराव देशमुख, संयोजक व जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, दुर्गेश मोहिते, उमेश साळुंखे आदींची उपस्थिती होती.आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘पतंगराव कदम यांनी ४५ वर्षे केलेल्या सेवेची पुण्याई मला बिनविरोध होण्यामध्ये कामी आली. महाराष्ट्राचे संरक्षण व शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील जनतेच्या हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.’

यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील, डॉ. सुधीर जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. शंकर जगताप यांनी स्वागत केले. जयवंतराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.मोदी सरकारकडून योजनांचे बारसे : जयकुमार गोरेकार्यक्रमप्रसंगी जयकुमार गोरे म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने काँग्रेसने राबवलेल्या योजनांचे बारसे घालून जुन्या योजनांची केवळ नावे बदलण्याचे काम केले. आघाडी सरकारच्या काळातील गॅसचा दर भाजप सरकारने दुप्पट केला. शेतकºयांचे तर यांनी बेहाल केले आहेत. त्यामुळे हे जुलमी सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.एकाच व्यासपीठावर पाच आमदारवडगाव हवेली येथे आमदार विश्वजित कदम सत्कार कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी या कार्यक्रमास पाच आमदार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्या एकत्रित आल्यामुळे नागरिकांच्यात हा चर्चेचा विषय ठरला.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसर