शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:00 IST

साताऱ्यातील एका कार्यक्रमात पोस्टर दाखवणाऱ्या महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्यासाठी बोलवून घेतले.

CM Devendra Fadnavis: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगाव येथील त्यांच्या जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार छगन भुजबळ आदी उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान, एका महिलेने पोस्टर दाखवत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी या महिलेला बाजूला केलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित महिलेला भेटण्यासाठी बोलवल्याचे पाहयला मिळाले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना नायगावच्या मातीने वेगळी ऊर्जा दिली आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी विषमता दूर करून समतेचे बीज पेरले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे भाषण करत असतानाच गर्दीत बसलेल्या एका महिलेने पोस्टर दाखवत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष त्या महिलेकेडे गेले. यावेळी त्यांनी भाषण थांबवून गोंधळ घालणाऱ्या महिलेला भेटण्यासाठी बोलवून घेतलं.

"त्यांना दाखवू द्या. तुम्ही नंतर मला भेटा. त्यांना मला भेटायला घेऊन या. त्यांची काय व्यथा असेल ती ऐकून घेऊ," असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणास पुन्हा सुरुवात केली. मात्र त्यानंतरही महिलेचा गोंधळ सुरुच होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महिला पोलिसांना त्यांना घेऊन येण्यास सांगितले. "ताई त्यांना शांतपणे घेऊन या. कोणी काही करत नाही. त्यांची काही व्यथा आहे त्यामुळे त्यांना मागे घेऊन या. या आपल्या ताई आहेत त्यांचे काही निवेदन आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी भाषणास सुरुवात केली.

"रसातळाला गेलेल्या समाजामध्ये विषमता जाऊन समतेचे बिजारोपण होईल आणि समजातील स्त्रियांना अधिकार मिळावा याची मुहूर्तमेढ जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रोवली. सावित्रीबाईंच्या मागे जोतिराव फुले हे हिमालयाप्रमाणे उभे होते. ज्या प्रथा स्त्रियांना स्त्री म्हणून जगण्याकरता ज्या थांबवत होत्या त्या सर्व प्रथांविरोधात फुले दाम्पत्याने क्रांतीची ज्योत पेटवली. सावित्रीबाई फुले यांचं स्मारक लवकरात लवकर विस्तारित स्वरूपात तयार करायला राज्य सरकारचं प्राधान्य असेल. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असणार आहे," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेSatara areaसातारा परिसर