शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

वातावरणातील बदल देत आहेत मानव जात नष्ट होण्याचे संकेत; ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग परिसंवादातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 22:46 IST

संपूर्ण जग हे विकासाच्या मागे लागले आहे. गरजा भागवण्यासाठी निसर्गाची हानी केली जात आहे.

सातारा : संपूर्ण जग हे विकासाच्या मागे लागले आहे. गरजा भागवण्यासाठी निसर्गाची हानी केली जात आहे. कार्बनडाय ऑक्साईड तसेच मिथेन वायूचे प्रमाणापेक्षा जास्त उत्सर्जन होते आहे. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस भयानकरित्या वाढत आहे. संपूर्ण जगभर वातावरणात होणारे घातक बदल हे मानव जात नष्ट होण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे वेळीच सावध होऊन यावर उपाययोजना शोधली पाहिजे,’ असा सूर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व लायन्स क्लब सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्लोबल वॉर्मिंग- ग्लोबल वॉर्मिंग’ या परिसंवादातून निघाला.

जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, अभिनेते सयाजी शिंदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लायन्स क्लबचे प्रांतपाल सुनील सुतार, प्रांतीय चेअरमन डॉ. शेखर कोवळे उपस्थित होते.

शहरे गॅस चेंबर्स झालीत : वंदना चव्हाण

अमेरिका हा सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे. जगातील महाशक्ती असणारा देश ते मान्य करायला तयार नाही. मात्र त्याचा तोटा भारत आणि बांगलादेश यांनाही होतोय. कार्बन, मिथेन या घातक वायूंमुळे काही दिवसांनंतर तर जगणे मुश्कील होईल. या दोन्ही वायूंचे उत्सर्जन कमी करावेच लागेल. युनायटेड नेशन्सने ‘पॅरिस करार’ केलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक देशाकडून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील, याबाबतची वचनबद्धता करून घेतली आहे. भारताने कोळसा जाळण्यावर मर्यादा आणू, सोलर पॅनल बसवू, तसेच कार्बन शोषून घेण्यासाठी झाडे लावू, असे वचन लिहून दिले आहे. आता सर्वांनी मिळूनच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. शहरे गॅस चेंबर्स होऊ लागल्याने आपल्यालाही वाहनांचा वापर टाळून सायकलचा वापर करावा लागणार आहे.

मुंबई सायकलिंग शहर करावे- अभिनेता आमिर खान

आपल्या देशातील महानगरांत मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची चिंता भेडसावत आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू या शहरांमध्ये वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्त आहे. त्याचा त्रास तेथील नागरिकांना होतो. मी मुंबईमध्ये सायकल चालवतो. मात्र वाहनांच्या गर्दीतून सायकल चालवताना अवघड जाते. मुंबई शहरामध्ये सायकलिंग ट्रॅक तयार केले, तर सायकल वापरणाऱ्यांची संख्या वाढेल आणि कार्बन उत्सर्जनावर मर्यादा आणता येईल.

समुद्राची वाढत जाणारी पातळी धोकादायक : डॉ. गुरुदास नूलकर

हवामानामध्ये घातक बदल होत आहेत. तापमान वाढत आहे. पुढील ५० वर्षांत तापमान ४ अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा परिणाम हिमनद्या वितळतील प्रचंडरित्या पाणी टंचाई जाणवेल. समुद्राच्या पातळीत वाढ होईल. समुद्राकाठची शहर समुद्रात जातील. शेती उत्पन्नात घट होईल तसेच शेतीची नासाडी होईल. संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

नगदी पिकांना विष घालतोय- मृण्मयी देशपांडे

आम्ही सध्या सातारा जिल्ह्यातील धावडी गावात राहतोय. या ठिकाणी रात्रीच्या वेळी डोंगराला वनवे लागल्याचे पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये प्रबोधनासाठी वाटचाल सुरू आहे. पिकांसाठी वापरण्यात येत असलेली औषधे ही विषद्रव्ये आहेत. त्यामुळे त्याचा वापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.

प्रत्येक जिल्ह्यात जैविक मिशन काढावे- पोळ

जमिनीत आढळणारा गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे, मात्र उसाची पाचट जाळत असताना आपण हा मित्रदेखील जाळून टाकतो. आपल्याकडील पशुसंवर्धन शास्त्रज्ञांचा वापर करून घेतल्यास शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. विषमुक्त शेती होणे आवश्यक आहे. कॅन्सर रुग्णालयमध्ये विषारी भाज्या खाल्ल्यामुळे कॅन्सर झालेले लोक जास्त प्रमाणात येत आहेत.

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसर