शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

मुलं वाचतात चक्क संस्कृतची पुस्तकं!

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

चिमुरडे हात अनुभवताहेत ग्रंथस्पर्श : अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

जावेद खान-- सातारा -केवळ दूरचित्रवाहिन्यांसमोर बसून भावी पिढी घडणार नाही. त्यातच मोबाईल, व्हिडिओ गेमसारखे अनेक माध्यमं त्यांचं लक्ष विचलित करत आहेत. भावी पिढी विचारसंपन्न व्हायची असेल तर तिला ग्रंथवाचनाचे बाळकडूच मिळायला पाहिजे. हाच धागा पकडून रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने ‘वर्गग्रंथ’ हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यानिमित्ताने चिमुरड्या हातांना ग्रंथस्पर्श लाभत आहे.प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करते, याला अनुसरून येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने गेल्यावर्षीपासून ‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम राबविला आहे. यासंदर्भात माहिती देताना प्राथमिकचे मुख्याध्यापक कमलाकर महामुनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘सध्या टीव्ही, मोबाईलमुळे मुलांची वाचनासंबंधीची आवड कमी होत आहे. मोबाईलवर तासंनतास गेम खेळत बसल्यामुळे मुलांचा शैक्षणिक विकासही खुंटत आहे. त्यांच्यात वाचनाची सवय लागावी, यासाठी प्रत्येक वर्गात ग्रंथालयांची निर्मिती केली आहे.’यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकांबरोबरच इंग्रजी, मराठी शब्दकोश, ललित लेखन, बालकथा, संतांची साहित्य संपदा, थोरामोठ्यांची चरित्रे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी दररोज दोन तास विद्यार्थी वाचन करतात. त्यानंतर वाचलेल्या ग्रंथांसंदर्भात चर्चा घडवून आणली जाते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव मिळत आहे. या वाचनामुळे स्पर्धा परीक्षेबरोबर भाषांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होऊ लागली आहे. ‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम कर्मवीर विद्या प्रबोधनीतर्फे चालविले जात आहे. त्याचे नियोजन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी असते. या उपक्रमात सध्या रयत गुरुकुल सुरू आहे. विविध विषयांवर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची कल-चाचणी, व्यक्तिमत्त्व विकास, सहशालेय उपक्रम, क्षेत्रभेट, विज्ञान सहलीचे नियोजन अशी अनेक उपक्रम विद्यालय राबवित आहे. मला वक्ता व्हायचंय...विद्यालयाने आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ‘मला वक्ता व्हायचंय’ या उपक्रमांतर्गत वक्तृत्वाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आठवड्यातून किमान एक तास मार्गदर्शन केले जाते. त्यांना विविध विषयांवर बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तम वक्त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित दाखविली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा वाढणार आहे.२५ वर्गांमध्ये ३५ ग्रंथगेल्यावर्षीपासून सुरू केलेल्या ‘वर्गग्रंथ’ उपक्रम ३५ वर्गांमध्ये सुरू आहे. यामध्ये सुमारे दोनशे पुस्तके ठेवली आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - कमलाकर महामुनी, मुख्याध्यापक.