शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

मुलं वाचतात चक्क संस्कृतची पुस्तकं!

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

चिमुरडे हात अनुभवताहेत ग्रंथस्पर्श : अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

जावेद खान-- सातारा -केवळ दूरचित्रवाहिन्यांसमोर बसून भावी पिढी घडणार नाही. त्यातच मोबाईल, व्हिडिओ गेमसारखे अनेक माध्यमं त्यांचं लक्ष विचलित करत आहेत. भावी पिढी विचारसंपन्न व्हायची असेल तर तिला ग्रंथवाचनाचे बाळकडूच मिळायला पाहिजे. हाच धागा पकडून रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने ‘वर्गग्रंथ’ हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यानिमित्ताने चिमुरड्या हातांना ग्रंथस्पर्श लाभत आहे.प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करते, याला अनुसरून येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने गेल्यावर्षीपासून ‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम राबविला आहे. यासंदर्भात माहिती देताना प्राथमिकचे मुख्याध्यापक कमलाकर महामुनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘सध्या टीव्ही, मोबाईलमुळे मुलांची वाचनासंबंधीची आवड कमी होत आहे. मोबाईलवर तासंनतास गेम खेळत बसल्यामुळे मुलांचा शैक्षणिक विकासही खुंटत आहे. त्यांच्यात वाचनाची सवय लागावी, यासाठी प्रत्येक वर्गात ग्रंथालयांची निर्मिती केली आहे.’यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकांबरोबरच इंग्रजी, मराठी शब्दकोश, ललित लेखन, बालकथा, संतांची साहित्य संपदा, थोरामोठ्यांची चरित्रे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी दररोज दोन तास विद्यार्थी वाचन करतात. त्यानंतर वाचलेल्या ग्रंथांसंदर्भात चर्चा घडवून आणली जाते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव मिळत आहे. या वाचनामुळे स्पर्धा परीक्षेबरोबर भाषांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होऊ लागली आहे. ‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम कर्मवीर विद्या प्रबोधनीतर्फे चालविले जात आहे. त्याचे नियोजन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी असते. या उपक्रमात सध्या रयत गुरुकुल सुरू आहे. विविध विषयांवर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची कल-चाचणी, व्यक्तिमत्त्व विकास, सहशालेय उपक्रम, क्षेत्रभेट, विज्ञान सहलीचे नियोजन अशी अनेक उपक्रम विद्यालय राबवित आहे. मला वक्ता व्हायचंय...विद्यालयाने आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ‘मला वक्ता व्हायचंय’ या उपक्रमांतर्गत वक्तृत्वाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आठवड्यातून किमान एक तास मार्गदर्शन केले जाते. त्यांना विविध विषयांवर बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तम वक्त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित दाखविली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा वाढणार आहे.२५ वर्गांमध्ये ३५ ग्रंथगेल्यावर्षीपासून सुरू केलेल्या ‘वर्गग्रंथ’ उपक्रम ३५ वर्गांमध्ये सुरू आहे. यामध्ये सुमारे दोनशे पुस्तके ठेवली आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - कमलाकर महामुनी, मुख्याध्यापक.