शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 12:00 IST

''मनुस्मृती अभ्यासक्रमात आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव''

कऱ्हाड (जि.सातारा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळगावी आले आहेत. मी शेतकरी असून सध्या शेतात असल्याचे ते ट्विट करत आहेत; पण आपण मुख्यमंत्री आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावे. राज्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे,’ असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.कऱ्हाड दौऱ्यावर आलेले पटोले म्हणाले, ‘ आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानाची धास्ती नाही. पंतप्रधान म्हणून त्यांचे हे शेवटचे ध्यान आहे. फक्त सध्या आचारसंहिता असल्याने त्यांचे ध्यान माध्यमातून येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. ते आचारसंहितेत बसत नाही अन् नरेंद्र मोदी म्हणून त्यांना पुढील काळात आता ध्यानच करत बसायचे आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले गेले याचे समर्थन कोणीही करणार नाही; पण मनुस्मृती अभ्यासात यावी, हा भाजपचा प्रयत्न आहे. त्याला काँग्रेस नेहमीच विरोध करेल. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव आहे. तो कालबाह्य ग्रंथ आहे. त्याचा अभ्यासक्रमात समावेश होऊ देणार नाही.पोर्शे अपघातप्रकरणी त्या गाडीत कोण-कोण होते? हे पुढे का येत नाही. पोलिस प्रकरण का दाबत आहेत? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. कारण आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. राज्याच्या जनतेने कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणाचा दबाव आहे, हे सगळे समोर आले पाहिजे. श्रीमंतांना वेगळा कायदा आहे का? असा सवाल करत जनता भयभीत आहे म्हणून मुख्यमंत्री यांनी उत्तर द्यावे, असेही पटोले एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

याचे उत्तर आव्हाडच देतील..महाविकास आघाडीने संविधान वाचवा म्हणून प्रचार केला; पण त्याचा घटकपक्ष असलेल्या एका पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संविधानाच्या विरोधात कृती केली आहे. याबाबत छेडताच याचे उत्तर जितेंद्र आव्हाड देतील, असे पटोले म्हणाले.

आम्ही बोललो की, त्यांना स्टंट वाटतो..आज गरिबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार राहिलेला नाही. श्रीमंत लोक त्यांची मुले पबमध्ये राहतील. तेथून गाडीची रेस लावतील गरिबांना चिरडून टाकतील. आम्ही त्यावर बोललो, जनतेचे प्रश्न मांडले की माजलेल्या सत्ताधाऱ्यांना स्टंट वाटत आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेNana Patoleनाना पटोलेdroughtदुष्काळ