शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 12:00 IST

''मनुस्मृती अभ्यासक्रमात आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव''

कऱ्हाड (जि.सातारा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळगावी आले आहेत. मी शेतकरी असून सध्या शेतात असल्याचे ते ट्विट करत आहेत; पण आपण मुख्यमंत्री आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावे. राज्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे,’ असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.कऱ्हाड दौऱ्यावर आलेले पटोले म्हणाले, ‘ आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानाची धास्ती नाही. पंतप्रधान म्हणून त्यांचे हे शेवटचे ध्यान आहे. फक्त सध्या आचारसंहिता असल्याने त्यांचे ध्यान माध्यमातून येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. ते आचारसंहितेत बसत नाही अन् नरेंद्र मोदी म्हणून त्यांना पुढील काळात आता ध्यानच करत बसायचे आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले गेले याचे समर्थन कोणीही करणार नाही; पण मनुस्मृती अभ्यासात यावी, हा भाजपचा प्रयत्न आहे. त्याला काँग्रेस नेहमीच विरोध करेल. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव आहे. तो कालबाह्य ग्रंथ आहे. त्याचा अभ्यासक्रमात समावेश होऊ देणार नाही.पोर्शे अपघातप्रकरणी त्या गाडीत कोण-कोण होते? हे पुढे का येत नाही. पोलिस प्रकरण का दाबत आहेत? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. कारण आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. राज्याच्या जनतेने कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणाचा दबाव आहे, हे सगळे समोर आले पाहिजे. श्रीमंतांना वेगळा कायदा आहे का? असा सवाल करत जनता भयभीत आहे म्हणून मुख्यमंत्री यांनी उत्तर द्यावे, असेही पटोले एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

याचे उत्तर आव्हाडच देतील..महाविकास आघाडीने संविधान वाचवा म्हणून प्रचार केला; पण त्याचा घटकपक्ष असलेल्या एका पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संविधानाच्या विरोधात कृती केली आहे. याबाबत छेडताच याचे उत्तर जितेंद्र आव्हाड देतील, असे पटोले म्हणाले.

आम्ही बोललो की, त्यांना स्टंट वाटतो..आज गरिबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार राहिलेला नाही. श्रीमंत लोक त्यांची मुले पबमध्ये राहतील. तेथून गाडीची रेस लावतील गरिबांना चिरडून टाकतील. आम्ही त्यावर बोललो, जनतेचे प्रश्न मांडले की माजलेल्या सत्ताधाऱ्यांना स्टंट वाटत आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेNana Patoleनाना पटोलेdroughtदुष्काळ