शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत आलो, पण...; रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:10 IST

वैचारिक मतभेद असले तरी आमचे मिशन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे

महाबळेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या सोबत आलो आहोत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपकडून ‘रिपाइं’चे नाव विशेषकरून घेतले जात नाही, अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. याबाबत उपमुख्यमंत्र्यांशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाबळेश्वर येथे मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) एकदिवसीय अभ्यास शिबिर पार पडले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, सीमा आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, केंद्रीय महासचिव अविनाश महातेकर, सरचिटणीस गौतम सोनावणे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.आठवले म्हणाले, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहायचे आहे. त्यांनीसुद्धा आपले नाव घेणे आवश्यक आहे. मात्र भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचे नाव विशेषकरून घेतले जात नाही.

रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. या पक्षाला टाळता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या सोबत आहोत. वैचारिक मतभेद असले तरी आमचे मिशन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे आहे. सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक भेटतात. त्यांची कामे होतात. त्यामुळे सत्ता आवश्यक असून लोकांना त्यामुळेच मदत होते. मात्र आपण चळवळीचे काम थांबवता कामा नये. चळवळ जिवंत ठेवली पाहिजे.अशोक गायकवाड यांनी आपल्या मनोगतात शिबिराचा उद्देश विशद केला. मान्यवरांकडूनही मनोगत व्यक्त करण्यात आले.‘त्या’ युतीचा परिणाम होणार नाहीवंचित बहुजन आघाडी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली असली तरी याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार नाही. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व आरपीआय ही आमची महायुती मजबूत आहे, असेही आठवले म्हणाले.

आठवले म्हणाले...

 

  • मागासवर्गीय व आदिवासींना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
  • सत्तेमधून सगळ्यांनाच सगळं मिळेल असं नाही. त्यामुळे केवळ चर्चा न करता काम करत राहा.
  • मंत्री झाल्यामुळे आपण फार मोठे होतो असे काही नाही, मंत्रिपदे येतात अन् जातात, मात्र कार्यकर्ता हे पद कायम राहतं.
  • छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आपल्याला पक्ष बांधायचा आहे.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदीRamdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा