शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत आलो, पण...; रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:10 IST

वैचारिक मतभेद असले तरी आमचे मिशन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे

महाबळेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या सोबत आलो आहोत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपकडून ‘रिपाइं’चे नाव विशेषकरून घेतले जात नाही, अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. याबाबत उपमुख्यमंत्र्यांशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाबळेश्वर येथे मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) एकदिवसीय अभ्यास शिबिर पार पडले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, सीमा आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, केंद्रीय महासचिव अविनाश महातेकर, सरचिटणीस गौतम सोनावणे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.आठवले म्हणाले, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहायचे आहे. त्यांनीसुद्धा आपले नाव घेणे आवश्यक आहे. मात्र भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचे नाव विशेषकरून घेतले जात नाही.

रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. या पक्षाला टाळता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या सोबत आहोत. वैचारिक मतभेद असले तरी आमचे मिशन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे आहे. सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक भेटतात. त्यांची कामे होतात. त्यामुळे सत्ता आवश्यक असून लोकांना त्यामुळेच मदत होते. मात्र आपण चळवळीचे काम थांबवता कामा नये. चळवळ जिवंत ठेवली पाहिजे.अशोक गायकवाड यांनी आपल्या मनोगतात शिबिराचा उद्देश विशद केला. मान्यवरांकडूनही मनोगत व्यक्त करण्यात आले.‘त्या’ युतीचा परिणाम होणार नाहीवंचित बहुजन आघाडी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली असली तरी याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार नाही. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व आरपीआय ही आमची महायुती मजबूत आहे, असेही आठवले म्हणाले.

आठवले म्हणाले...

 

  • मागासवर्गीय व आदिवासींना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
  • सत्तेमधून सगळ्यांनाच सगळं मिळेल असं नाही. त्यामुळे केवळ चर्चा न करता काम करत राहा.
  • मंत्री झाल्यामुळे आपण फार मोठे होतो असे काही नाही, मंत्रिपदे येतात अन् जातात, मात्र कार्यकर्ता हे पद कायम राहतं.
  • छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आपल्याला पक्ष बांधायचा आहे.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदीRamdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा