शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विटांनीच भरलं नदीचं पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:57 IST

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला.सीतामाईच्या डोंगर कड्यावरून वाहन येणारी बाणगंगा ...

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला.सीतामाईच्या डोंगर कड्यावरून वाहन येणारी बाणगंगा नदी उपळवे, दालवडी, मांडवखडक, कुरवली, तावडीमार्गे फलटण शहराच्या माध्यमातून प्रवेश करत पुढे कांबळेश्वर, सोमंथळीजवळ नीरा नदीला मिळते. बाणगंगा कधीकाळी चार महिने वाहत होती. आपल्या परिसंस्थेवर ती अनेकांना जगवत होती. शेती, पशुपक्षी यांना वरदान ठरत होती. मोठा पाऊस झाल्यावर ती तिचं अस्तित्व सिद्ध करते.बाणगंगा नदीच्या दुर्लक्षामुळे तिची नैसर्गिक प्रकृती हरवत चालली आहे. पद्मावती मंदिर परिसरातून नदी फलटणकडे धाव घेते. येथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. फलटण झपाट्याने वाढत आहे. उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. जुन्या इमारतींचा राडा रोडा दगड, वीट, माती टाकण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बाणगंगेचं पात्र असा नागरिकांचा समज झाला आहे. यामुळे नदीचे पात्र अडवले जात आहे. पात्र अरुंद होत आहे. या घाणीमुळे पावसाळ्यात पाणी व्यवस्थित पूर्ण क्षमतेने वाहू शकत नाही. परिणामी दुसऱ्या बाजूने पात्र विस्तारताना दिसते. यामुळे नदीपात्राशेजारील घरांना धोका निर्माण करतो. शनी मंदिराजवळ असणारा परिसर धोक्यात आहे.प्रशासनाची डोळेझाकबाणगंगेचे पात्र पूर्वी बºयापैकी स्वच्छ होते; पण फलटणच्या वाढत्या विस्ताराने बाणगंगेच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभे आहेत. फक्त राडा रोडाच नाही तर अनेक प्रकारची मानवी अतिक्रमने पाहायला मिळतात. प्रशासन डोळ्यावर हात ठेवून आहे. बाणगंगेच्या नैसर्गिक प्रकृतीशी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ नये व तिची जपणूक व्हावी म्हणून आणखी खूप प्रयत्न होणे आवश्यक आहेत.