शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:21 IST

लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ठळक मुद्देडाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाकक्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

लोणंद : लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दर नसल्याने डबघाईला आलेल्या शेतकऱ्याच्या मागील संकट काही कमी होताना दिसत नाही. कोरोनामुळे शेतकऱ्यावर मोठे संकटच उभे राहिले आहे. शेतमालाला भाव नसताना शेतकरी मोठ्या हिमतीने शेतीमध्ये नवनवे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र, त्याला निसर्गाची व शासनाची साथ मिळताना दिसत नाही. त्यातच तेल्या व मर यासारख्या रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत.

या संकटांमुळे शेतकाऱ्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. मात्र, हार न मानता क्षीरसागर कुटुंबाने मोठ्या कष्टाने डाळिंबाची बाग उभी केली. कमी पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळाला आलेल्या बागेसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. संपूर्ण बागेतील ९०० झाडांना ठिबक सिंचनची सोय केली होती.

मोठ्या डौलाने उभी राहिलेल्या या बागेला मात्र दि. २६ रोजी रात्री अचानक आग लागली. आग कशी लागली का कोणी लावली, याचे कारण जरी समजू शकले नाही. तरी एका रात्रीत या डाळिबांच्या बागेची राख होताना पाहण्याचे दुर्भाग्य या कुटुंबावर आले.

यामध्ये संपूर्ण ड्रीपच्या पाईप जळून खाक झाल्या मोठ्या कष्टाने उभी केलेली डाळिंबाची बाग काही क्षणात जळून खाक झाल्याने क्षीरसागर कुटुंबीयांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. बागेचा पंचनामा संबंधित विभागाने केला आहे. तरी लवकरात लवकर या कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी क्षीरसागर कुटुंबीय करीत आहेत.दोन कोट व चौकट येणार आहे. 

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर