शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

डाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:21 IST

लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ठळक मुद्देडाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाकक्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

लोणंद : लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दर नसल्याने डबघाईला आलेल्या शेतकऱ्याच्या मागील संकट काही कमी होताना दिसत नाही. कोरोनामुळे शेतकऱ्यावर मोठे संकटच उभे राहिले आहे. शेतमालाला भाव नसताना शेतकरी मोठ्या हिमतीने शेतीमध्ये नवनवे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र, त्याला निसर्गाची व शासनाची साथ मिळताना दिसत नाही. त्यातच तेल्या व मर यासारख्या रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत.

या संकटांमुळे शेतकाऱ्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. मात्र, हार न मानता क्षीरसागर कुटुंबाने मोठ्या कष्टाने डाळिंबाची बाग उभी केली. कमी पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळाला आलेल्या बागेसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. संपूर्ण बागेतील ९०० झाडांना ठिबक सिंचनची सोय केली होती.

मोठ्या डौलाने उभी राहिलेल्या या बागेला मात्र दि. २६ रोजी रात्री अचानक आग लागली. आग कशी लागली का कोणी लावली, याचे कारण जरी समजू शकले नाही. तरी एका रात्रीत या डाळिबांच्या बागेची राख होताना पाहण्याचे दुर्भाग्य या कुटुंबावर आले.

यामध्ये संपूर्ण ड्रीपच्या पाईप जळून खाक झाल्या मोठ्या कष्टाने उभी केलेली डाळिंबाची बाग काही क्षणात जळून खाक झाल्याने क्षीरसागर कुटुंबीयांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. बागेचा पंचनामा संबंधित विभागाने केला आहे. तरी लवकरात लवकर या कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी क्षीरसागर कुटुंबीय करीत आहेत.दोन कोट व चौकट येणार आहे. 

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर