शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पूर मानवनिर्मित, पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत : श्रीमंत कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:21 IST

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देपूर मानवनिर्मित असल्याचा कोकाटे यांचा आरोपपूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी

सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.कोकाटे म्हणाले, या तीन जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूरामुळे माणसे, जनावरे, घरे, शेती व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील अनेक घरे पडलेली आहेत. ज्या घरात पाणी गेले आहे, ती घरे जीवितास धोकादायक आहेत, त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत, ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते, या शेतीचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. जमिनीची मशागत करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. शासनाने सरसकट शेतकरी व शेतमजूर यांना नुकसान भरपाई द्यावी. पशुधन ही ग्रामीण भागातील समांतर अर्थव्यवस्था आहे. अनेक जनावरे दगावली आहेत, वाचलेल्या जनावारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिक पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, स्कूल बॅग, गणवेश मोफत द्यावेत.हा पूर मानवनिर्मित असल्याचा आरोप करुन कोकाटे पुढे म्हणाले, कर्नाटक सरकार बनाव करत आहे. अलमट्टी धरण हे १२३ टीएमसीचे नसून २२३ टीएमसीचे आहे. कृष्णेचे अतिरिक्त पाणी कऱ्हाड  येथून उचलून सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबादमधील दुष्काळी गावांना देण्यासाठी शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून निर्णय घ्यावा.यावेळी निसार मुल्ला, अमोल संकपाळ, राहुल बर्गे, प्रशांत यादव, प्रमोद काटे, सुनील भोसले, सूर्यकांत चव्हाण, सत्यजित सानप, राजन सूर्यवंशी, ज्योतिराम यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर