शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

भुरकवडीतील येरळा नदीवरील पुलाचा भराव लागला खचू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:26 IST

Ncp, Yerla, River, pwd, rain, sataranews भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली मागार्वर असलेल्या येरळा नदीवर मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून नव्याने पूल बांधला होता. तो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर दोन्ही बाजूकडील भराव अतिवृष्टीच्या महापूरामुळे खचत चालला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे पार्टीचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांकडून पाहणी कोट्यवधी रुपये पाण्याचा जाण्याचा धोका; ग्रामस्थांतून संताप

खटाव : भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली मागार्वर असलेल्या येरळा नदीवर मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून नव्याने पूल बांधला होता. तो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर दोन्ही बाजूकडील भराव अतिवृष्टीच्या महापूरामुळे खचत चालला आहे.

यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या पुलाला धोका निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे पार्टीचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी पाहणी दौऱ्यावेळी वडुज येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सागर देवकर उपस्थित होते.या पूलाच्या पाहणीबरोबर गावची पाणी पुरवठा करणारी जुनी विहीर वाहून गेली आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांचे शेती पीके व शेती साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचीही पाहणी* देशमुख व मांडवे यांनी करून संबधीत यंत्रणेला फोनवरून तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, माजी सरपंच एस. के. कदम, माजी उपसरपंच ए. के. कदम, चेअरमन हणमंत कदम, माजी चेअरमन मधुकर कदम, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष कैलासराव जाधव, शरद कदम, मनोज कदम, पोलीस पाटील किरण कदम, जालिंदर कदम, दिलीप कदम, संतोष कदम उपस्थित होते.चौकटखटाव तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या औंधच्या यमाई देवस्थानला जाण्यासाठी भाविकांचे दृष्टीने महत्वाचा जवळचा मार्ग आहे. या पुलावरून नेहमी वर्दळ असते. मलवडी, निढल, खटाव, खातगुण, भुरकवडी, दरुज, दरजाई येथील भाविक या रस्त्यावरून जातात. पुलपलीकडे असणाऱ्या शेतीतून निघणाऱ्या मालाची वाहतूक, तसेच ऊसाच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या पुलावरूनच होते.या पुलाला सहा वर्षे झाली असून पुलाची उंची देखील आहे. हा पूल बांधकाम विभागातर्फे बांधला आहे. पुलावरून आजवर पाणी गेले नव्हते परंतु यंदा पावसामुळे पुलावरून चार फूट पाणी वाहत होते. या पुलाचे काम केलेले ठेकेदार पुण्याचे असल्याने त्याच्याशी संपर्क होत नाही परंतु या पुलाचा भराव खचल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. 

टॅग्स :DamधरणriverनदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसर