शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 17:19 IST

: सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

ठळक मुद्देकास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा घाणीचे साम्राज्य : निसर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त

पेट्री/सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही अनेक तरूण व नागरिक कास पठार व तलाव परिसरात भटकंतीसाठी येत असतात. काही हुल्लडबाज तरुणांकडून तलावाच्या परिसरात पार्ट्या केल्या जातात. तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, वापरलेले मास्क तलावाच्या आवारात फेकून दिले जातात. त्यामुळे जैवविविधतेने नटलेल्या या परिसरातील पर्यावरणाला बाधा पोहोचत आहे.कास तलाव परिसरात दिवसेंदिवस कचऱ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. अविवेकीपणामुळे या पर्यटनस्थळांचे निसर्गसौंदर्य हरवून बसण्याची चिंता निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. या पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलून स्वच्छता कशी राहील, यासाठी प्रयत्नशील असायला हवे. मात्र, असे होताना दिसत नाही.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळांवर बंदी असताना बहुसंख्य नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. कास तलावात जलविहार करणे, तेलकट भांडी साबण अथवा डिटर्जंटने धुणे, यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका असून, जलचरांनादेखील धोका उद्भवू शकतो.

टॅग्स :environmentपर्यावरणKas Patharकास पठारSatara areaसातारा परिसरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न