शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 17:19 IST

: सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

ठळक मुद्देकास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा घाणीचे साम्राज्य : निसर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त

पेट्री/सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही अनेक तरूण व नागरिक कास पठार व तलाव परिसरात भटकंतीसाठी येत असतात. काही हुल्लडबाज तरुणांकडून तलावाच्या परिसरात पार्ट्या केल्या जातात. तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, वापरलेले मास्क तलावाच्या आवारात फेकून दिले जातात. त्यामुळे जैवविविधतेने नटलेल्या या परिसरातील पर्यावरणाला बाधा पोहोचत आहे.कास तलाव परिसरात दिवसेंदिवस कचऱ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. अविवेकीपणामुळे या पर्यटनस्थळांचे निसर्गसौंदर्य हरवून बसण्याची चिंता निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. या पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलून स्वच्छता कशी राहील, यासाठी प्रयत्नशील असायला हवे. मात्र, असे होताना दिसत नाही.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळांवर बंदी असताना बहुसंख्य नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. कास तलावात जलविहार करणे, तेलकट भांडी साबण अथवा डिटर्जंटने धुणे, यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका असून, जलचरांनादेखील धोका उद्भवू शकतो.

टॅग्स :environmentपर्यावरणKas Patharकास पठारSatara areaसातारा परिसरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न