शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

हुश्शऽऽऽ आंधळी धरण भरले, माणगंगा दुथडी भरून वाहू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:03 IST

माणगंगा नदीवरील आंधळी धरण सोमवारी पहाटे भरले असून माणगंगा नदी आता उगमापासून दुथडी वाहू लागली आहे. यामुळे आंधळी, टाकेवाडी, परकंदी, पांगरी, वडगाव, दहिवडी, बिदाल, गोंदवले या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावाना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देहुश्शऽऽऽ आंधळी धरण भरले, माणगंगा दुथडी भरून वाहू लागली बिदाल, आंधळी, दहिवडीसह गोंदवलेचा पिण्याचा पाणी प्रश्न मिटला

दहिवडी : माणगंगा नदीवरील आंधळी धरण सोमवारी पहाटे भरले असून माणगंगा नदी आता उगमापासून दुथडी वाहू लागली आहे. यामुळे आंधळी, टाकेवाडी, परकंदी, पांगरी, वडगाव, दहिवडी, बिदाल, गोंदवले या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावाना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.माण तालुक्याचा सरासरी पाऊस ४६५ मिलीमीटर होत असतो मात्र ही सरासरी अनेक वर्षे पावसांनी ओलंडली नव्हती. गेल्या वर्षी ७०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे माण तालुक्यातील तलाव भरले होते. तीच अवस्था यावर्षी होत आहे. आज आखेर माण तालुक्यात ५१० मिलिमीटर पाऊस पडल्याने सलग दुसऱ्या वर्षी ५०० मिलिमीटर पाऊस पडला आहे.माण तालुक्यात माणगंगा नदीवर आंधळी या ठिकाणी धरण आहे. हे धरण भरल्यानंतरच माणगंगा उगमापासून शेवटापर्यंत वहात असते. रविवारी हे धरण भरण्यासाठी २ फूट कमी होते. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास आंधळी धरणाच्या वरच्या बाजूला शिरवली, कुळकजाई, टाकेवाडी, परकंदी, मलवडी, आंधळी, भांडवली या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला.

त्यामुळे आंधळी धरणाच्या वरच्या बाजूकडील कासारवाडी, बोलाई, परकंदी, टाकेवाडी, शेडगेवाडी, गायदरा हे ओडे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागल्याने आंधळी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली. पहाटे तीनच्या सुमारास आंधळी धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले.माणगंगा नदी दुथडी वाहात असून या नदीवरील आंधळी, बिदाल, दहिवडीतून शेवरीकडे जाणारे पुल पाण्याखाली गेले आहेत. या पुढे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आंधळी धरण भरले असून याचा बिदाल, आंधळी, पांगरी परिसरातील शेतीला फायदा होणार आहे. या धरणाला डावा कालवा वडगावपर्यंत तर उजवा कालवा दहिवडीपर्यंत असून हे दोन्ही कालवे आता दुरुस्त करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर