शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भाजपकडून केवळ सुडाचे राजकारण

By admin | Updated: February 17, 2017 22:51 IST

धनंजय मुंडे : रेठरे बुद्रुक येथे काँग्रेस व राष्ट्रवादीची जाहीर सभा

रेठरे बुद्रुक : ‘भाजपाचे सरकार हे सत्तापिपासू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंना निवडणुकीच्या तोंडावर केलेली अटक होय,’ असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँगे्रस व राष्ट्रीय काँगे्रसची संयुक्त प्रचार सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम साळुंखे होते. यावेळी काँगे्रसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, ‘पंधरा वर्षांच्या नवसान भाजपवाले सत्तेत आले आहेत. उद्या राहतील की नाही हे सांगता येत नाही. परंतु जोपर्यंत केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता आहे. तोपर्यंत जर सत्ताधाऱ्यांनी राजकीय द्वेषापोटी सुडाचे व जातीपातीचे राजकारण करत राहिले तर भविष्यात भाजपचाही रोज एक आमदार जेलमध्ये जाईल. या भागात गलिच्छ राजकारण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणले. पद देतो, पैसा देतो. साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करून भाजप इतर पक्षांतील लोकांना आपल्या पक्षात घेत आहे.भ्रष्टाचार मुक्त देश व काला धन आणणार या मुद्द्यावर नोटाबंदी करून सरकारने ग्रामीण जनतेला वेठीस धरले. कष्टाचे पैसे बँकेतून काढायला दहा-दहा तास बँकेच्या रांगेत उभे केले. हा कष्टाचा अपमानच नाही का? ग्रामीण भागाला कॅशलेसच्या नावाखाली मोदी सरकार पुन्हा बलुतेदार पद्धतीकडे नेत आहे.’सभेच्या सुरुवातीस अजित मोहिते, उत्तमराव मोहिते, जयवंत जगताप आणि अजित पाटील-चिखलीकर यांनी मोहिते-भोसले यांचे जुळणारे आणि तुटणारे मनोमिलन यावर सडेतोड टीका करून तोंडसुख घेतले. (वार्ताहर)रेठरेकरांचा स्वाभिमान कधी जागृत होणार : पृथ्वीराज चव्हाणपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘धनंजय मुंडे आणि मी एका व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक सभा मानावी लागेल. दिवंगत यशवंतराव मोहिते भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला. त्यावेळी मराठी भाषिकांचं राज्य आलं पाहिजे, राज्याची सत्ता ही शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात गेली पाहिजे. ही त्यांची भावना होती. या भावनेतून १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली अन् दिवंगत यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. त्याच मातीतील आपण सर्वजण आज कोणत्या विचाराच्या मागे जातोय याचा विचार करा, असा चिमटा त्यांनी मदनराव मोहिते यांचे नाव न घेतला काढला.’अविनाश मोहिते यांच्या अटकेविषयी चव्हाण म्हणाले, ‘अन्यायकारक पद्धतीने अविनाश मोहिते यांना तुरुंगात घातले आहे. रेठरेकरांचा स्वाभिमान जागृत कधी होणार यांच्या अटकेचा राग काढण्याची हीच संधी आहे.’