शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

भाजपकडून केवळ सुडाचे राजकारण

By admin | Updated: February 17, 2017 22:51 IST

धनंजय मुंडे : रेठरे बुद्रुक येथे काँग्रेस व राष्ट्रवादीची जाहीर सभा

रेठरे बुद्रुक : ‘भाजपाचे सरकार हे सत्तापिपासू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंना निवडणुकीच्या तोंडावर केलेली अटक होय,’ असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँगे्रस व राष्ट्रीय काँगे्रसची संयुक्त प्रचार सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम साळुंखे होते. यावेळी काँगे्रसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, ‘पंधरा वर्षांच्या नवसान भाजपवाले सत्तेत आले आहेत. उद्या राहतील की नाही हे सांगता येत नाही. परंतु जोपर्यंत केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता आहे. तोपर्यंत जर सत्ताधाऱ्यांनी राजकीय द्वेषापोटी सुडाचे व जातीपातीचे राजकारण करत राहिले तर भविष्यात भाजपचाही रोज एक आमदार जेलमध्ये जाईल. या भागात गलिच्छ राजकारण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणले. पद देतो, पैसा देतो. साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करून भाजप इतर पक्षांतील लोकांना आपल्या पक्षात घेत आहे.भ्रष्टाचार मुक्त देश व काला धन आणणार या मुद्द्यावर नोटाबंदी करून सरकारने ग्रामीण जनतेला वेठीस धरले. कष्टाचे पैसे बँकेतून काढायला दहा-दहा तास बँकेच्या रांगेत उभे केले. हा कष्टाचा अपमानच नाही का? ग्रामीण भागाला कॅशलेसच्या नावाखाली मोदी सरकार पुन्हा बलुतेदार पद्धतीकडे नेत आहे.’सभेच्या सुरुवातीस अजित मोहिते, उत्तमराव मोहिते, जयवंत जगताप आणि अजित पाटील-चिखलीकर यांनी मोहिते-भोसले यांचे जुळणारे आणि तुटणारे मनोमिलन यावर सडेतोड टीका करून तोंडसुख घेतले. (वार्ताहर)रेठरेकरांचा स्वाभिमान कधी जागृत होणार : पृथ्वीराज चव्हाणपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘धनंजय मुंडे आणि मी एका व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक सभा मानावी लागेल. दिवंगत यशवंतराव मोहिते भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला. त्यावेळी मराठी भाषिकांचं राज्य आलं पाहिजे, राज्याची सत्ता ही शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात गेली पाहिजे. ही त्यांची भावना होती. या भावनेतून १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली अन् दिवंगत यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. त्याच मातीतील आपण सर्वजण आज कोणत्या विचाराच्या मागे जातोय याचा विचार करा, असा चिमटा त्यांनी मदनराव मोहिते यांचे नाव न घेतला काढला.’अविनाश मोहिते यांच्या अटकेविषयी चव्हाण म्हणाले, ‘अन्यायकारक पद्धतीने अविनाश मोहिते यांना तुरुंगात घातले आहे. रेठरेकरांचा स्वाभिमान जागृत कधी होणार यांच्या अटकेचा राग काढण्याची हीच संधी आहे.’