शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून केवळ सुडाचे राजकारण

By admin | Updated: February 17, 2017 22:51 IST

धनंजय मुंडे : रेठरे बुद्रुक येथे काँग्रेस व राष्ट्रवादीची जाहीर सभा

रेठरे बुद्रुक : ‘भाजपाचे सरकार हे सत्तापिपासू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहितेंना निवडणुकीच्या तोंडावर केलेली अटक होय,’ असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँगे्रस व राष्ट्रीय काँगे्रसची संयुक्त प्रचार सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम साळुंखे होते. यावेळी काँगे्रसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, ‘पंधरा वर्षांच्या नवसान भाजपवाले सत्तेत आले आहेत. उद्या राहतील की नाही हे सांगता येत नाही. परंतु जोपर्यंत केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता आहे. तोपर्यंत जर सत्ताधाऱ्यांनी राजकीय द्वेषापोटी सुडाचे व जातीपातीचे राजकारण करत राहिले तर भविष्यात भाजपचाही रोज एक आमदार जेलमध्ये जाईल. या भागात गलिच्छ राजकारण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणले. पद देतो, पैसा देतो. साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करून भाजप इतर पक्षांतील लोकांना आपल्या पक्षात घेत आहे.भ्रष्टाचार मुक्त देश व काला धन आणणार या मुद्द्यावर नोटाबंदी करून सरकारने ग्रामीण जनतेला वेठीस धरले. कष्टाचे पैसे बँकेतून काढायला दहा-दहा तास बँकेच्या रांगेत उभे केले. हा कष्टाचा अपमानच नाही का? ग्रामीण भागाला कॅशलेसच्या नावाखाली मोदी सरकार पुन्हा बलुतेदार पद्धतीकडे नेत आहे.’सभेच्या सुरुवातीस अजित मोहिते, उत्तमराव मोहिते, जयवंत जगताप आणि अजित पाटील-चिखलीकर यांनी मोहिते-भोसले यांचे जुळणारे आणि तुटणारे मनोमिलन यावर सडेतोड टीका करून तोंडसुख घेतले. (वार्ताहर)रेठरेकरांचा स्वाभिमान कधी जागृत होणार : पृथ्वीराज चव्हाणपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘धनंजय मुंडे आणि मी एका व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक सभा मानावी लागेल. दिवंगत यशवंतराव मोहिते भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला. त्यावेळी मराठी भाषिकांचं राज्य आलं पाहिजे, राज्याची सत्ता ही शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात गेली पाहिजे. ही त्यांची भावना होती. या भावनेतून १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली अन् दिवंगत यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. त्याच मातीतील आपण सर्वजण आज कोणत्या विचाराच्या मागे जातोय याचा विचार करा, असा चिमटा त्यांनी मदनराव मोहिते यांचे नाव न घेतला काढला.’अविनाश मोहिते यांच्या अटकेविषयी चव्हाण म्हणाले, ‘अन्यायकारक पद्धतीने अविनाश मोहिते यांना तुरुंगात घातले आहे. रेठरेकरांचा स्वाभिमान जागृत कधी होणार यांच्या अटकेचा राग काढण्याची हीच संधी आहे.’