शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेसयुक्त होतोय, हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला टोला

By प्रमोद सुकरे | Updated: May 10, 2025 19:44 IST

दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच

कराड : काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करीत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झाला आहे हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे. अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कराड येथे बोलताना लगावला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शनिवारी दुपारी कराड येथे आले होते.त्यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी त्यांनी अभिवादन केले.त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अजितराव पाटील- चिखलीकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, तालुकाध्यक्ष निवास थोरात, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, अमित जाधव, रणजित देशमुख, शेरखान पठाण, तात्या पाटील आदींची उपस्थिती होती.सपकाळ म्हणाले, काँग्रेसची भूमिका ही नेहमी भारत जोडोची राहिलेली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, दोन कुटुंबे एकत्र आली तर आम्हाला आनंदच होईल. ..त्यामुळे आघाडी करावी लागलीखरंतर गतकाळात आघाडीची अपरिहार्यता होती. त्यामुळे राजकारणात आम्हाला आघाडी करावी लागली. त्याचेच मोठे नुकसान आम्हाला सोसावे लागले. मात्र आता आम्ही नव्याने काँग्रेसची बांधणी चांगल्या पद्धतीने करणार आहोत.असेही सपकाळ एका प्रश्नावर म्हणाले.

'तो' निर्णय स्थानिक पातळीवरचसन २०२५ हे वर्ष पक्षाने संघटनात्मक वर्ष जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अपेक्षित फेरबदल, दुरुस्त्या होतील या शंका नाही. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या स्वतंत्र लढवायच्या ही स्थानिक पातळीवर पुन्हा आघाड्या करूनच लढवायच्या हा निर्णय जिल्हास्तरावरील स्थानिक नेते घेतील. तशी मोकळीक त्यांना देण्यात आली असल्याचेही ते एका प्रश्नावर म्हणाले. काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाहीकाँग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना कोणी करत असले तर काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही. कारण भारताचा आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए एकच आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी, राज्यघटना वाचण्यासाठी या पुढच्या काळामध्ये काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल. काँग्रेस पक्षाला दीडशे वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे कोणी ओसाड गावची पाटीलकी माझ्याकडे आली असे म्हणत असेल तर ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास सध्या ऑपरेशन सिंदूर सरकारने सुरू ठेवले आहे. त्याबाबत सगळे पक्ष सरकारच्या पाठीशी असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत छेडले असता सपकाळ म्हणाले, खरंतर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मोडून तोडून ते दाखवले जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर सगळ्यांनी एकत्रीत सामोरे जाण्याची आहे हे समजून घेतले पाहिजे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळBJPभाजपा