शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

By प्रमोद सुकरे | Updated: June 5, 2024 16:05 IST

अजित पवारांसोबतचे १८ आमदार संपर्कात, फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही हे निकालातून दाखवले 

कराड : भाजपने आमचा परिवार फोडला, पक्ष फोडला.त्यांना वाटलं दिल्ली स्टाईल महाराष्ट्रात भूमिका चालतील.पण त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही.महाराष्ट्रातील लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही हे त्यांनी निकालातून दाखवून दिले आहे.असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना नाव न घेता लगावला.युवा नेते रोहित पवार बुधवारी कराडच्या प्रतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, यु्वा नेते सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर,प्रशांत यादव, मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे,जशराज पाटील, सौरभ पाटील आदिंची उपस्थिती होती.आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये लोकांच्या माध्यमातून आपल्या विचाराला लोकसभा निवडणुकीत यश मिळालेले आहे.त्यामुळे लोकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. खरंतर यशवंतराव चव्हाण यांचे विचार फक्त फोटो लावून मिळत नसतात. ते विचार जपावे लागतात. अन् ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ते विचार कायमच जपलेले आहेत. म्हणूनच यशवंत विचारप्रेमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी घेईल. त्याच्यात जास्तीत जास्त नवीन चेहरे पाहायला मिळतील.असेही पवार यांनी सांगितले.अजित पवार पुन्हा कराडला आत्मक्लेश करण्यासाठी येतील ? यापूर्वी राजकारणात काही चुका झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी आत्मकलेश करण्यासाठी आले होते. याची आठवण करून देत अजित पवार पुन्हा कराडला आत्मक्लेश करण्यासाठी येतील का? याबाबत छेडले असता हा त्यांचा प्रश्न आहे असे रोहित पवार यांनी सांगणे पसंद केले.

म्हणून मी 'तसे' ट्विट केले 'बच्चा बडा हो गया है!' असे आपण ट्विट केले आहे. नेमके हे तुम्हाला कोणाला सांगायचे आहे? असा प्रश्न विचारताच बच्चा म्हणून ज्यांनी आम्हाला या निवडणूक प्रचारात हिणवले होते. त्यांच्यासाठी माझे ते मत आहे. आता तर लोकांनी आम्हाला पाठिंबा देऊन निकालातून दाखवून दिले आहे की बच्चा कोण आहे ते. आम्ही तर स्वतःला आजही कार्यकर्ता समजतो. पण युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. असच मला सांगायचे आहे असे रोहित पवार म्हणाले.

सातारच्या पराभवाचा अभ्यास करावा लागेलकराड परिसर हा यशवंत विचाराचा आहे. मात्र याच लोकसभा मतदार संघात यशवंत विचाराचा पराभव झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, खरंच हा निकाल अनपेक्षित लागला.आम्हा सर्वांना याबाबत अभ्यास करावा लागणार आहे.पण शशिकांत शिंदेंनी कमी वेळात दिलेली लढत ही निश्चितच चांगली आहे .भाजपच्या मोठ- मोठ्या नेत्यांनी सातारा मतदार संघात मोठी ताकद लावली होती. पैशाचा मोठा वापर झाला ही बाब आमच्या कानावर आली आहे.असेही पवार म्हणाले.

विचारांचा पराभव झाला हे महत्त्वाचे

पार्थ पवारांनंतर सुमित्रा पवार यांचा देखील पराभव झाला आहे. या पराभवांकडे तुम्ही कसे पहाता?असे रोहित पवारांना विचारताच ते म्हणाले, व्यक्ती महत्त्वाची नाही विचारांचा पराभव झाला हे जास्त महत्त्वाचे आहे.

अजित पवारांसोबतचे १८ आमदार संपर्कात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे १८ आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात आहेत? याबाबत आपण भाष्य केले आहे. याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, होय त्यांचे१८ ते १९ आमदार आमच्या पक्ष प्रमुखांच्या संपर्कात आहेत. पण त्यापैकी कोणाला सोबत घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे पक्षप्रमुखच ठरवतील. पण ज्यांनी अडचणीच्या काळात मदत केली त्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल.असेही ते म्हणाले. पण त्यांचे १२ आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत. हे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच ते१२ आमदार काय करतील ते पुढच्या काही दिवसात समोर येईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडRohit Pawarरोहित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा