शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भोसरे ग्रामस्थांनी बनवलं सांडपाणीमुक्त गाव- प्रत्येक कुटुंबाकडे शोषखड्डे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:35 IST

गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील

ठळक मुद्दे घाण अन् दुर्गंधी दूर होऊन रोगराई कमी होण्यास मदत

सातारा : गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने शोषखड्डे खणले असून, आपल्या घरातील सांंडपाणी गटारात न सोडता ते शोषखड्ड्यात सोडले. त्यामुळे गाव तर सांडपाणीमुक्त झालेच आहे. त्याचबरोबर गावातील रोगराई नष्ट करण्यास मदत झाली आहे.

सांडपाणी म्हणजे घरातून बाहेर पडणारे वापरलेले पाणी. त्यात शौचालय, स्वयंपाक घर, न्हाणीघर यातून बाहेर पडणारे पाण्याचा समावेश असतो. असे पाणी पिण्यास अयोग्य असते. हे पाणी गटारात किंवा रस्त्यावर मोकळे सोडले तर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते. डासांची अंडी घालायला जाग मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारख्ेया आरोगांचा संसर्ग होतात. या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य न लावण्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतो.

या पाण्याचा पर्यावरणावर देखील परिणाम विपरीत परिणाम होत असतो. यावर मात करण्यासाठी भोसरे ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन घरोघरी शोषखड्डे खणण्याचा निर्णय घेतला. त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. त्यामुळे आज गावात ५५० शोषखड्डे असून, काही लोकांना जागा नाही, अशा व्यक्तींसाठी एक सामूहिक शोषखड्डा खणला आहे. यामुळे गावातील एकाही घरातून सांडपाणी गटार व रस्त्यावर सोडले जात नाही. त्यामुळे गावातील घाण, दुर्गंधी दूर होऊन रोगराई दूर होण्यास मदत झाली आहे.बंद पडलेल्या कूपनलिका झाल्या रिचार्जखटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गावांनी मागील चार वर्षांपासून चांगलीच कंबर कसली. यामध्ये भोसरे गावानेही उडी घेतली. मागील तीन वर्षांत गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. त्यामध्ये ग्रामस्थांनी श्रमदान व मशीनच्या माध्यमातून पाणलोट विकासाचे काम उभे केले. त्यामुळे शिवारातील पाण्याची पातळी वाढली; मात्र गावठाणातील कूपनलिका बंद पडल्या होत्या. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करून घरोघरी शोषखड्डे खणले. या शोषखड्ड्यांमुळे गावात वापरलेले पाणी जमिनीत मुरले. त्यामुळे गावातील भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिका पूर्ण रिचार्ज झाल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास