शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

भोसरे ग्रामस्थांनी बनवलं सांडपाणीमुक्त गाव- प्रत्येक कुटुंबाकडे शोषखड्डे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:35 IST

गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील

ठळक मुद्दे घाण अन् दुर्गंधी दूर होऊन रोगराई कमी होण्यास मदत

सातारा : गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने शोषखड्डे खणले असून, आपल्या घरातील सांंडपाणी गटारात न सोडता ते शोषखड्ड्यात सोडले. त्यामुळे गाव तर सांडपाणीमुक्त झालेच आहे. त्याचबरोबर गावातील रोगराई नष्ट करण्यास मदत झाली आहे.

सांडपाणी म्हणजे घरातून बाहेर पडणारे वापरलेले पाणी. त्यात शौचालय, स्वयंपाक घर, न्हाणीघर यातून बाहेर पडणारे पाण्याचा समावेश असतो. असे पाणी पिण्यास अयोग्य असते. हे पाणी गटारात किंवा रस्त्यावर मोकळे सोडले तर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते. डासांची अंडी घालायला जाग मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारख्ेया आरोगांचा संसर्ग होतात. या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य न लावण्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतो.

या पाण्याचा पर्यावरणावर देखील परिणाम विपरीत परिणाम होत असतो. यावर मात करण्यासाठी भोसरे ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन घरोघरी शोषखड्डे खणण्याचा निर्णय घेतला. त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. त्यामुळे आज गावात ५५० शोषखड्डे असून, काही लोकांना जागा नाही, अशा व्यक्तींसाठी एक सामूहिक शोषखड्डा खणला आहे. यामुळे गावातील एकाही घरातून सांडपाणी गटार व रस्त्यावर सोडले जात नाही. त्यामुळे गावातील घाण, दुर्गंधी दूर होऊन रोगराई दूर होण्यास मदत झाली आहे.बंद पडलेल्या कूपनलिका झाल्या रिचार्जखटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गावांनी मागील चार वर्षांपासून चांगलीच कंबर कसली. यामध्ये भोसरे गावानेही उडी घेतली. मागील तीन वर्षांत गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. त्यामध्ये ग्रामस्थांनी श्रमदान व मशीनच्या माध्यमातून पाणलोट विकासाचे काम उभे केले. त्यामुळे शिवारातील पाण्याची पातळी वाढली; मात्र गावठाणातील कूपनलिका बंद पडल्या होत्या. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करून घरोघरी शोषखड्डे खणले. या शोषखड्ड्यांमुळे गावात वापरलेले पाणी जमिनीत मुरले. त्यामुळे गावातील भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिका पूर्ण रिचार्ज झाल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास