शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

भोसरे ग्रामस्थांनी बनवलं सांडपाणीमुक्त गाव- प्रत्येक कुटुंबाकडे शोषखड्डे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:35 IST

गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील

ठळक मुद्दे घाण अन् दुर्गंधी दूर होऊन रोगराई कमी होण्यास मदत

सातारा : गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने शोषखड्डे खणले असून, आपल्या घरातील सांंडपाणी गटारात न सोडता ते शोषखड्ड्यात सोडले. त्यामुळे गाव तर सांडपाणीमुक्त झालेच आहे. त्याचबरोबर गावातील रोगराई नष्ट करण्यास मदत झाली आहे.

सांडपाणी म्हणजे घरातून बाहेर पडणारे वापरलेले पाणी. त्यात शौचालय, स्वयंपाक घर, न्हाणीघर यातून बाहेर पडणारे पाण्याचा समावेश असतो. असे पाणी पिण्यास अयोग्य असते. हे पाणी गटारात किंवा रस्त्यावर मोकळे सोडले तर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते. डासांची अंडी घालायला जाग मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारख्ेया आरोगांचा संसर्ग होतात. या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य न लावण्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतो.

या पाण्याचा पर्यावरणावर देखील परिणाम विपरीत परिणाम होत असतो. यावर मात करण्यासाठी भोसरे ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन घरोघरी शोषखड्डे खणण्याचा निर्णय घेतला. त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. त्यामुळे आज गावात ५५० शोषखड्डे असून, काही लोकांना जागा नाही, अशा व्यक्तींसाठी एक सामूहिक शोषखड्डा खणला आहे. यामुळे गावातील एकाही घरातून सांडपाणी गटार व रस्त्यावर सोडले जात नाही. त्यामुळे गावातील घाण, दुर्गंधी दूर होऊन रोगराई दूर होण्यास मदत झाली आहे.बंद पडलेल्या कूपनलिका झाल्या रिचार्जखटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गावांनी मागील चार वर्षांपासून चांगलीच कंबर कसली. यामध्ये भोसरे गावानेही उडी घेतली. मागील तीन वर्षांत गावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. त्यामध्ये ग्रामस्थांनी श्रमदान व मशीनच्या माध्यमातून पाणलोट विकासाचे काम उभे केले. त्यामुळे शिवारातील पाण्याची पातळी वाढली; मात्र गावठाणातील कूपनलिका बंद पडल्या होत्या. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करून घरोघरी शोषखड्डे खणले. या शोषखड्ड्यांमुळे गावात वापरलेले पाणी जमिनीत मुरले. त्यामुळे गावातील भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिका पूर्ण रिचार्ज झाल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास