शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

Satara: विकास नव्हे, बीअर बार वाढले : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:08 IST

'वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढलं'

पाटण (जि. सातारा) : ‘पाटण तालुक्यासह महाराष्ट्राने विक्रमसिंह पाटणकर यांचा मंत्रिपदाचा काळ अनुभवला, मात्र सध्याचे मंत्री हे दहशत माजवत गैरप्रकाराला पाठबळ देत आहेत. पाटणला या मंत्रिमहोदयांच्या काळात विकास नव्हे, तर बीअर बार वाढले आहेत. वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढलं आहे,’ असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. पाटण येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, ‘आरोग्य, रस्ते, शेती पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यात महिलांवरील बलात्कार, बालकांवरील अत्याचार, महागाई वाढत आहे. वाय प्लस सुरक्षा असतानाही जर यांचे लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर स्थानिक जनता कशी सुरक्षित राहणार याचाही विचार करायला पाहिजे.खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ‘महायुतीचे सरकार अगदी चित्रपटांना लाजवेल असा कारभार करत आहे. जाऊ तिथे खाऊ, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि काय द्याचं बोला अशीच या मंडळींची अवस्था आहे. मुख्यमंत्री दसरा मेळाव्यात आपण पळून जाणाऱ्यातला नाही असे म्हणाले. पण दुर्दैवाने ते पळवून नेणाऱ्यातले आहेत, हे बोलायला विसरले. त्यांनी राज्यातील सेनेचे आमदारच नव्हे, तर तुमचा विकास, तुमचे प्रकल्प, तुमचा रोजगार, तुमचा स्वाभिमान पळवून नेत तो दिल्लीपतींच्या पायावर नेऊन ठेवल, यापेक्षा दुर्दैव नाही.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटील