शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अधिकतर तरुण-तरुणी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्याने आता जोडीदार शोधतानाही या सोशल मीडियाची मदत घेतली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : अधिकतर तरुण-तरुणी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्याने आता जोडीदार शोधतानाही या सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. मात्र, यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असून गेल्या तीन वर्षांत २१ जणांचा खिसा पिवळे हात होण्याआधीच रिकामा झाला आहे. यामध्ये विशेषत: विवाह ठरवणाऱ्या एजंटांकडूनही लुटालूट होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

खरं म्हणजे विवाह हे एक पवित्र बंधन असतं. नात्यातलं मांगल्य विवाह संस्थेतूनच राखता येतं. त्यामुळे आपल्या संस्कृतीत विवाह संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. शतकानुशतके विवाह संस्थेचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न समाजपातळीवर झाला आहे. मात्र, अलीकडे ही विवाह संस्था मोडीत निघते की काय, अशी भीती व्यक्त होतेय. त्याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेले सोशल मीडियाचे भूत. तरुण पिढी सोशल मीडियावर ओळख झाली की लगेच विवाह ठरवताहेत. पण दुसरीकडे अनेकांची फसवणूकही होत आहे. सुंदर मुलीचा फोटो ठेवून मुलांना आकर्षित केले जाते. पण वास्तविक हा फोटो एखाद्या मुलाचाच असतो. त्याच्या भावनेला हात घालत आर्थिक मागणी केली जाते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुले पैसे देतात. नंतर मात्र, जेव्हा समजतं ती नव्हे तर तो होता. तेव्हा मात्र, पश्चात्तापाची वेळ येते. असे अलीकडे बरेच प्रकार घडल्याचे पाहायला मिळतेय.

चाैकट : ही घ्या काळजी...

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.

चॅटिंगमधून बोलताना पैशांची मागणी झाल्यास सतर्क राहा.

पैसे न देता तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधा.

वैयक्तिक फोटो अनोळखी व्यक्तीला पाठवू नये.

चाैकट : अशी होऊ शकते फसवणूक

१) तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुमची वैयक्तिक माहिती घेतली जाते. त्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल केले जाते. परिणामी पैशांची मागणी होते. अनेक जण आपली बदनामी होइल, या भीतीपोटी मागेल तेवढे पैसे देतात. त्यामुळे ही वेळ येऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे.

२) सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर समोरून विवस्त्र फोटोची मागणी होते. अशा वेळी कोणत्याही मोहपाशात न अडकता थेट सायबर सेलशी संपर्क साधणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीचा ब्लॅकमेल करण्याचा हेतू असतो. तसेच विवाह ठरविणाऱ्या एजंटांचाही आता सुळसुळाट झालाय. हे एजंट विवाह ठरविण्यासाठी पन्नास हजारांपासून तब्बल दोन लाखांपर्यंत पैसे घेत आहेत. अशा एजंटांपासूनही सावध राहायला हवे.

कोट : ऑनलाइन जोडीदार शोधताना अनेकांची फसवणूक झालीय. संबंधितांनी समोरच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवून आपली वैयक्तिक माहिती त्यांना दिली. या माहितीच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल केले गेले. रोज एक तरी तक्रार सायबर सेलकडे येत असते. यावर सतर्कता हाच एकमेव फसवणूक टाळण्याचा उपाय आहे.

- अजय जाधव, सायबर सेल तज्ज्ञ, सातारा