शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

एफआरपी न देणाऱ्यांवर कारवाईबाबत आश्वासित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

कराड : राज्य सरकार शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत मिळाली पाहिजे यासाठी आग्रही आहे. पण ,अनेक कारखान्यांनी ती दिलीच नसल्याने ...

कराड : राज्य सरकार शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत मिळाली पाहिजे यासाठी आग्रही आहे. पण ,अनेक कारखान्यांनी ती दिलीच नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मी त्यांना १ एप्रिल रोजी साखर आयुक्त यांच्याशी चर्चा करतो, आढावा घेतो, जे एफआरपी देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आश्वासित केले आहे. मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले आहे .असे मत राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे व्यक्त केले.

मंत्री पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखानदारांनी चौदा दिवसात एफआरपी दिली पाहिजे असा कायदा आहे. मात्र अजूनही काही कारखानदारांनी ती दिलेली दिसत नाही. गतवर्षी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे प्रमाण ९५ टक्के होते. यंदा ते ८३ टक्क्यांवर आले आहे. याबाबत कारखानदारांकडून जी कारणे दिली जात आहेत, त्यात प्रामुख्याने साखरेचे मूल्य तीन हजार १०० रुपये आहे, पण त्या प्रमाणात साखर विक्री होत नाही. त्यामुळे काही कारखानदारांनी त्याचे हप्ते पाडले आहेत, तर काहींनी एफआरपी दिलेलीच नाही.

वास्तविक सहकारमंत्री या नात्याने मी नेहमीच पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात याबाबतचा आढावा घेत असतो. एफआरपी दिली नाही त्यांच्यावर आपण आरआरसीप्रमाणे कारवाई करतो. म्हणजे त्या कारखान्यांची साखर ताब्यात घेतो व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्याची विक्री केली जाते. त्यातून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे दिले जातात .तशी कारवाई आपण यापूर्वीही केलेली आहे. यावर्षी सुद्धा संबंधितांना तशा सूचना केलेल्या आहेत.

ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्या कारखान्यांवर गत वर्षीप्रमाणे कारवाई होणारच. मग ते कारखाने कोणाचेही असले तरी त्याचा विचार केला जाणार नाही. कारण शेतकऱ्यांना पैसे मिळणे महत्त्वाचे आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.

चौकट

माझ्या खात्याशी संबंधित प्रश्नावरच बोललो ..

शेतकरी संघटनेचे इतरही काही प्रश्न आहेत. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले असता मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, होय त्यांचा वीजबिलाचाही प्रश्न आहे. मी मात्र माझ्या खात्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नावरच प्रामुख्याने चर्चा केली आहे. पण शासनानेही वीजबिलाबाबत अनेक सवलत दिली आहे असेही त्यांनी सांगितले.

फोटो :आयकार्ड

बाळासाहेब पाटील