शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, नाना पटोलेंचा घणाघात 

By नितीन काळेल | Updated: February 24, 2024 15:37 IST

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४२ जागा महाविकास आघाडी जिंकण्याचा कल 

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले. त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, असा घणाघातही केला.सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, धनश्री महाडिक, अॅड. विजयराव कणसे, प्रा. विश्वंभर बाबर, संदीप माने, जगन्नाथ कुंभार आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘राज्यातील मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली २०१४ पासून देवेंद्र फडणवीस फसवत आहेत. भाजपकडून आरक्षणाचा बागुलबुवा केला जात आहे. मराठा आणि ओबीसीत वादाचे बीज भाजपनेच रोवले. आता ते शिखरावर गेले आहे. भाजपमुळेच आरक्षणाला मुठमाती मिळालेली आहे. आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा नुसता गवगवा केला जातोय. यातूनही भाजपने फसविण्याचेच काम केले असून मनोज जरांगे-पाटील आणि समऱ्थकांतही वाद लावला जात आहे.भाजपकडून आरक्षणमुक्त भारतचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही जातगणना करायला तयार नाहीत, असे सांगून प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नाही. दिल्लीजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना गोळ्या घालून मारले जात आहे. केंद्र शासनाने केलेले कायदे हे लोकशाही संपष्टात आणण्यासाठीच केले आहेत. पण, देशात आता इंडिया आघाडीचेच सरकार येणार आहे.

गॅरंटी शब्द आमचा; त्यांची गॅरंटी संपलीय..भाजप गॅरंटी शब्द वापरत आहे. पण, हा शब्द आमचा असून त्यांनी चोरला आहे. या गॅरंटीला त्यांनी अपमानीत केले आहे. त्यांची गॅरंटी आता संपली आहे, असा टोला पटोले यांनी भाजपला लगावला. तसेच धर्म, जातीच्या नावावर राजकारणाचा एक अजेंडा वापरण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.

माझ्यावर आरोप स्वाभाविक..पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून जाण्याबद्दल आणि त्यांचा रोख आपल्याकडे असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पटोले यांनी मी मंत्री नव्हतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी माझ्यावर आरोप करणे स्वाभाविक आहे. पण, ते आयुष्यभर काँग्रेसबरोबर राहिले. पण, पक्षाचा खासदार त्यांनी एकवर आणून ठेवला, असे ठामपणे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाNana Patoleनाना पटोलेAshok Chavanअशोक चव्हाण