शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद

By नितीन काळेल | Updated: June 12, 2024 19:28 IST

दाहकतेच्या माणमध्ये ४६ गावे ३१४ वाड्या तहानलेल्याच 

सातारा : मागील सहा महिन्यांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत. सध्या १४८ टॅंकरवर १४१ गावे आणि ४५३ वाड्यांची तहान अवलंबून आहे. तरीही माणमधील अजुनही ४६ गावे आणि ३१४ वाड्यांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नव्हता. तसेच जिल्ह्यातील एकाही तालुक्याने १०० टक्क्यांची सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नव्हती. तसेच कोयना धरणातही कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा सुरू झाल्या होत्या. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गहन झालेला. त्यामुळे अनेक गावांना टॅंकर सुरू होते. तर बहुतांशी गावांना मार्च महिन्यापासून टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. त्यानंतर दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली.मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात तब्बल २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी २०८ टॅंकरचा धुरळा उडत होता. तर या टॅंकरवर २ लाख ३३ हजार नागरिक आणि अडीच लाखांहून अधिक पशुधन अवलंबून होते. यामध्ये माणमध्येच टंचाई अधिक होती. तालुक्यातील ७१ गावे आणि ४४५ वाड्यांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. ८८ टॅंकरवर सवा लाख लोकांची तहान अवलंबून होती. यानंतर खटाव तालुक्यातही टंचाई वाढलेली. ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले. ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांना ४१ टॅंकरचा आधार होता. त्याचबरोबर फलटण तालुक्यातही ३३ टॅंकर सुरू होते. ४२ गावे आणि ११३ वाड्यांना पाणीपुरवठा होत होता.कोरेगाव तालुक्यातीलही ३३ गावांसाठी २६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. खंडाळा तालुक्यात २, वाईमध्ये ६ गावे आणि ५ वाड्या तसेच पाटण तालुक्यात २ गावे व ८ वाड्या आणि कऱ्हाड तालुक्यातील ७ गावांसाठी टॅंकर सुरू होते. मात्र, मागील आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने टंचाई एकदम कमी झाली आहे.जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत टंचाईची स्थिती आहे. त्यासाठी सध्या १४८ टॅंकर सुरू आहेत. यावर २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनाची तहान अवलंबून आहे. सध्या टंचाईची दाहकता अजुनही माण तालुक्यात आहे. माणमध्ये अजुनही ७० टॅंकर सुरू आहेत. तर खटाव तालुक्यात १७, फलटणला २५, कोरेगाव तालुक्यात २४, खंडाळा १, वाई तालुक्यात ७, जावळीत १ आणि कऱ्हाड तालुक्यात ३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

दुष्काळी तालुक्यात टंचाई कमी..जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि काेरेगाव या दुष्काळी तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, सध्या या तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे टंचाई कमी झालेली आहे. तसेच टॅंकरची संख्याही घटली आहे. सध्या माणमधील ४६ गावे आणि ३१४ वाड्या, खटावमध्ये २१ गावे व ४० वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तसेच फलटणला ३२ गावे आणि ९३ वाड्या आणि कोरेगाव तालुक्यातील २९ गावांसाठी टॅंकर सुरू आहे. पावसाने टंचाई कमी झाल्याने प्रशासनावरील ताण कमी झाला आहे. तसेच खर्चही कमी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळRainपाऊस