शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गाडी लावण्यावरून वाद, वाईत पालघरच्या पर्यटकांच्या गाडीवर दगडफेक; तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:28 IST

झोपडपट्टीतील मुलांबरोबर बस लावण्यावरून चालकाची किरकोळ बाचाबाची झाली

वाई (जि. सातारा) : पालघर तालुक्यातील एडवन येथील एक कुटुंब शनिवारी दुपारी वाई येथे आले होते. महागणपती घाटावर गाडी लावण्यावरून झोपडपट्टीतील तरुणांशी चालकाचा वाद झाला. त्यातून त्यांच्या गाडीवर काही तरुणांनी दगडफेक केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जितेंद्र प्रभाकर तरे, मोहन हरिचंद्र तरे, प्रतीक दिलीप तरे अशी जखमी पर्यटकांची नावे आहेत.पालघर तालुक्यातील एडवन येथील पर्यटक कुटुंबीयांसमवेत वाईच्या महागणपतीचे दर्शन घेऊन पुढे मुक्कामी मांढरदेव येथील काळूबाईच्या दर्शनासाठी जात असतात. हे पर्यटक शनिवारी दुपारी वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी खासगी प्रवासी बस (क्र. एमएच ०४ जीपी ०८७६) घेऊन पोहोचले. बसचा चालक गणपती पुलावर बाजूला बस उभी करत असतानाच तेथे झोपडपट्टीतील मुलांबरोबर बस लावण्यावरून चालकाची किरकोळ बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.या हाणामारीची माहिती जवळच असलेल्या झोपडपट्टीत समजली. अनेक तरुण, महिलाही गणपती पुलावर पोहोचल्या. जमावाने बसवर हल्ला चढवला. यात बसच्या काचा फोडून दगड बसमध्ये बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यावर आदळले. यामध्ये जितेंद्र प्रभाकर तरे (वय ४०), मोहन हरिचंद्र तरे (६२), प्रतीक दिलीप तरे (२१) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाई पोलिसांनी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर काही महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस