नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या गटाने १४ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विरोधकांना फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. सन १९९५ मध्ये आरक्षणाचा मुद्दा नसतानाही भीमरावदादा पाटील यांनी मुस्लिम समाजातील खुदबूद्दीन नदाफ यांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी दिली होती. त्यानंतर यंदा सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण जाहीर झाले होते. त्या पदासाठी आलताब मुल्ला व शंकर तांदळे हे दोन दावेदार होते. मात्र, दोघांनाही संधी दिली जाणार असल्याने मुल्ला यांना पहिली पसंती देत सरपंच पदाचा मान मिळाला. २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला संधी मिळाली आहे. मुल्ला हे ग्रामपंचायतीचे २०वे सरपंच झाले आहेत. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने मतदान न घेता निवडणूक अधिकारी राजेंद्र महिंद यांनी सरपंच व उपसरपंचाची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. पारस पाटील, अरूण साठे, प्रकाश पाटील, शशिकला जंगम, वर्षा माळी, संगीता यादव, मंगल सुतार, कल्पना देसाई, शोभा पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
फोटो: आलताब मुल्ला यांची सरपंचपदी व पांडुरंग बिळास्कर यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली त्यावेळी सर्व सदस्य व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.