शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह मिळेल, शिवसेना शिंदे गटातील मंत्र्याने व्यक्त केला विश्वास

By नितीन काळेल | Updated: July 7, 2023 19:09 IST

महाविकास आघाडीची वज्रमूढ आता ढिली झाली

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचार आणि धोरण बदलले आहे. त्यामुळे १० वा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीत आली आहे. अजितदादांच्या जाण्याने महाविकास आघाडीची वज्रमूढ आता ढिली झाली आहे,’ असा हल्लाबोल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. तसेच सध्याचे बहुमत पाहता अजित पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांची माहिती देण्यासाठी अयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कारण, गेल्यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करताना धावपळ करावी लागली. यावर्षी वेळेपूर्वी १०० टक्के निधी खर्च कसा होईल यावर निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जुलै महिन्याअखेरपर्यंत जास्तीतजास्त कामाची वर्क आॅर्डर काढण्यात येणार आहे. त्यामुळे १०० टक्के निधी वेळेत खर्च होईल. तसेच जलजीवन मिशनमधून घराेघरी स्वच्छ पाणी देण्यात येणार आहे. या मिशनच्या कामांनीही वेग घेतला असून निधीही आणला आहे.   राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी अजित पवार हे महायुतीत आल्याने शिंदे गट नाराज झालेला नाही. आम्ही ५० जण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मान दिलेली आहे. पूर्वी युतीत ९ पक्ष होते. आता राष्ट्रवादी काॅंग्रेस हा दहावा पक्ष म्हणून सामील झालाय, असे सांगितले. तसेच शिंदे गट राष्ट्रवादी काॅंग्रेसवर नेहमी टीका करायचा. आता अजित पवार युतीत आल्याने अडचण निर्माण झाली आहे का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर मंत्री देसाई यांनी अजित पवार हे चालणारे नाणे आहे. त्यांनी विचार आणि धोरण बदललंय. अजित पवारांच्या येण्याने आमची ताकद वाढली आहे, असे स्पष्ट केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील १७ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री देसाई यांनी राऊत यांनी नावे सांगावीत असे आव्हान दिले. तसेच ते बोलतात आणि तोंडघशी पडतात असा टोलाही लगावला. 

दर्जेदार रस्त्यांसाठी स्वतंत्र गुणनियंत्रण समिती...जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याचा आढावाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावर पत्रकार परिषदेत त्यांनी बांधकाम विभागाला रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याची सूचना केल्याचे सांगितले. तसेच ही कामे दर्जेदार होण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र गुणनियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारShambhuraj Desaiशंभूराज देसाई