शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार

By दीपक शिंदे | Updated: March 9, 2024 17:02 IST

बारामती, रायगड अन् शिरूरवरच समाधान 

दीपक शिंदेसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट आग्रही होता. मात्र, भाजपने या मतदारसंघावर आपला दावा करत सातारा भाजपसाठी सोडण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या गटात त्यामुळे अस्वस्थता असली तरीदेखील त्यांना सोबतच काम करावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. त्याबाबत अजित पवार यांनीही आपण साताऱ्याबाबत आग्रही असल्याचे सांगितले. मात्र, मागील दोन दिवसांत अनेक बैठका आणि चर्चा सुरू झाल्या असून अजित पवारांनी साताऱ्याचा नाद सोडून केवळ बारामती, रायगड आणि शिरूरवरच समाधान मानल्याचे सांगण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना मिळणाऱ्या कमी जागा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी अडचणीचा विषय ठरणार आहे. त्यामुळे या गटात थोडी नाराजीच दिसून येत आहे. आमदार मकरंद पाटील यांनी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही तर कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असा निकराचा इशारा दिला होता. मात्र, भाजपच्या राजकीय दबावापोटी फार काही हातात पडेल असे दिसत नसल्याने, मिळणाऱ्या जागांवरच समाधानी होऊन त्याच जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

खासदार उदयनराजेंचे कार्यकर्ते लागले कामालाराष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघ सोडल्याचे कळताच खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते पुन्हा जोशात कामाला लागले आहेत. मेळावे आणि मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीपूर्वीच उदयनराजेंचा प्रचार सर्वदूर पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमांना होत असलेली गर्दी आणि साताऱ्याचा खासदार असावा, अशी असणारी अपेक्षा यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची सर्वांना आतुरता लागलेली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा खासदार उदयनराजेंसाठी अधिक अनुकूल आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांनाच संधी मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. भाजपच्या नेतृत्वाने देखील या मागणीचा गांभीर्याने विचार केला आहे. त्यामुळे उदयनराजेंना नक्कीच संधी मिळणार असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढला आहे. - सुनील काटकर, समन्वयक, सातारा लोकसभा मतदारसंघ 

सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सोडला जावा, अशी आमची कायम मागणी होती. भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. त्याबरोबरच मित्रपक्षांच्या सोबतीने भाजपला हक्काचा खासदार मिळवून देण्याची संधी आहे. लवकरच याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणार असून सर्वच जण आता या निर्णयाची वाट पाहत आहेत. - धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले