शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अजित पवारांमुळे भाजपला फरक नाही; भाजपचे मंत्री स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 08:12 IST

अजयकुमार मिश्रा : लोकसभेच्या उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. १८ कोटी सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला  काही फरक पडेल असे वाटत नाही. जो काही फायदा, तोटा होईल, ते भविष्यात समजलेच, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री  व भाजपचे साताऱ्याचे संपर्क प्रभारी अजय कुमार मिश्रा यांनी केले. 

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मिश्रा पुढे म्हणाले, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारताच्या नव्या संसद भवनामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण, जी - २० परिषद आणि १३ हजार कोटींची महत्त्वाकांक्षी विश्वकर्मा योजना यामुळे भारताने देशातील विविध विकास योजनांना वेगळी गती दिली आहे. जी -२० परिषदेच्या माध्यमातून भारताने आपली संस्कृती आणि परंपरा यांची वेगळी ओळख जगाला घडवून दिली आहे. या परिषदेच्या भारतातील ६० शहरांमध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या. विश्वशांतीच्या दृष्टीने आणि विश्वकल्याणाच्या दृष्टीने भारत हे एक प्रमुख केंद्र असल्याची जाणीव या परिषदेच्या निमित्ताने निर्माण झाली. 

मिश्रा म्हणाले, महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या सर्व ४८  जागा खात्रीने निवडून आणणार आहे. सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा कोणता असणार याबाबत मिश्रा म्हणाले, अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. ज्यावेळी बैठकीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचे निर्णय होतील, त्यावेळी ही नावे जाहीर केली जातील. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी तपासून चिकित्सा समितीकडे या संदर्भात चर्चा सुरू आहे. योग्य वेळी या दोन्ही आरक्षणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा