सातारा : साताऱ्याच्या मातीशी हक्काचे नाते सांगणारे, प्रशासकीय शिस्तीचा कणा असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा सातारा जिल्हा शोकसागरात बुडाला. त्यांचे साताऱ्याशी असलेले नाते केवळ राजकीय नव्हते तर ते भावनिक आणि कौटुंबिक होते. साताऱ्याच्या विकासाचा गाडा हाकताना त्यांनी या जिल्ह्याला नेहमीच झुकते माप दिले.सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न तब्बल चार दशकांपासून धूळ खात पडला होता. अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र हा तिढा सुटत नव्हता. महाविकास आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनी या प्रस्तावात लक्ष घातले.
वाचा: मेडिकल कॉलेजच्या जागेसाठी रात्रीत मंजुरी, लोकार्पणाला अजितदादा नसणार ही खंत सातारकरांच्या मनात राहणारपायाभूत सुविधांना बळसातारकरांची तहान भागवणाऱ्या कास पाणी योजनेचा प्रश्न असो वा दुर्गम भागातील रस्ते, अजित पवार यांनी कधीही निधी कमी पडू दिला नाही. कास धरणाची उंची वाढवण्याच्या ऐतिहासिक कामासाठी त्यांनी वेळोवेळी निधीची तरतूद केली. तसेच संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीच्या उभारणीच्या वेळी, ‘तुम्ही २५ टक्के काम करा, उरलेली मदत मी मिळवून देतो,’ हा त्यांनी दिलेला शब्द आजही सातारा जिल्ह्याच्या सामाजिक वर्तुळात आदराने काढला जातो.
Web Summary : Ajit Pawar's support for Satara's development, especially the long-pending city expansion, is remembered. He ensured funds for key projects like the Kas water scheme and infrastructure, fulfilling commitments to the district. His dedication left a lasting impact.
Web Summary : अजित पवार ने सातारा के विकास, विशेषकर लंबे समय से लंबित शहर के विस्तार का समर्थन किया। उन्होंने कास जल योजना जैसी प्रमुख परियोजनाओं के लिए धन सुनिश्चित किया और जिले के प्रति प्रतिबद्धताओं को पूरा किया। उनके समर्पण का स्थायी प्रभाव रहा।