शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अजित पवारांचा बूस्टर डोस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोसणार का?, कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:10 IST

कोरेगावात अजित पवार यांनी व्यासपीठावरील नेते मंडळींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला

साहिल शहाकोरेगाव : कोरेगावात सोमवारी झालेल्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यासपीठावरील नेते मंडळींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला. निवडणुकीच्या यश-अपयशाबद्दल बोलत असतानाच त्यांनी जनतेत जाऊन काम करण्याचा कानमंत्र दिला. मात्र, हा कानमंत्र किती जणांच्या पचनी पडला आणि भविष्यकाळात हा कानमंत्र वापरून राष्ट्रवादीला ऊर्जितावस्था मिळवून देणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मंगळवारी कार्यकर्त्यांमध्ये या विषयाची दबक्या आवाजात चर्चा होती.विधानसभा निवडणुकीपासून कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने बॅक फूटवर जात होती. अनेक निवडणुकीत पराभवाला सामोरे जात असताना पक्ष संघटना काही केल्या बळकट होत नव्हती. बाजार समिती निवडणुकीत मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली. केवळ मूठ बांधून ते थांबले नाहीत तर निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बरोबर घेऊन विजय संपादन केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीला काहीअंशी अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागले. मात्र सांघिक यश मिळवत बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.या विजयाप्रीत्यर्थ अजितदादा पवार यांनी कोरेगावात येऊन जाहीर सभा घेतली. स्पष्ट वक्ते आणि कुशल प्रशासक या दोन्ही भूमिका त्यांच्या भाषणामधून दिसून आल्या. त्यांनी विजयी झालेल्या संचालकांना शुभेच्छा देत असताना चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या. नेते मंडळींनाही कानपिचक्या देत या विजयाने हुरळून न जाण्याचा इशारा दिला.अजित पवार यांचा कोरेगावशी तसा निकटचा संबंध आहे. सातत्याने ते कोरेगाव दौऱ्यावर येत असतात, त्यामुळे त्यांना तालुक्याची किंबहुना विधानसभा मतदारसंघाची खडान्खडा माहिती आहे. त्यांनी भाषणामध्ये स्वकियांबरोबरच विरोधकांचा सातबारादेखील काढला. अनेकांनी आपली राजकीय दृष्टी बदलावी यासाठी आपापले चष्मेदेखील पुसायला भाग पाडले, मात्र या नेते मंडळींची राजकीय दृष्टी भविष्यकाळात तरी सुधारेल का, हा मोठा प्रश्न आहे.पवार कुटुंबातील व्यक्ती आली की पक्ष संघटना जिवंत होते आणि त्यांची वाट फिरल्यानंतर येरे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती या मतदारसंघात आजवर पहावयास मिळते. त्यामुळे अजितदादांचा दौरा हा राष्ट्रवादी काँग्रेसला फलदायी ठरणार का? हा आगामी काळच ठरवणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण