शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
3
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
4
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
5
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
6
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
7
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
8
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
9
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
10
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
11
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
12
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
13
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
14
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
15
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
16
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
17
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
18
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
19
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
20
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘नवीन महाबळेश्वर’मधील जमिनींवर धनिकांचा डोळा, स्थानिक भूमिहीन होण्याची शक्यता 

By दीपक देशमुख | Updated: July 19, 2025 18:27 IST

कमाल जमीन धारणा कायदा धाब्यावर

दीपक देशमुखसातारा : देशासह जगभरातील पर्यटकांचा भार वाहताना महाबळेश्वरमधील प्रशासनावर कमालीचा ताण येत आहे. यामुळेच पश्चिम घाटाकडे पर्यटकांचा ओढा वळवण्यासह तेथील पर्यटनस्थळांची जगभर ओळख होण्यासाठी ‘नवीन महाबळेश्वर’ची संकल्पना समोर आली. परंतु, मंत्रालयात पडीक असणाऱ्या अनेक बड्या धेंडांना याची कल्पना आल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी-विक्री हाेऊ लागली. साम-दाम-दंड-भेद वापरून जमिनी बड्या धेंडांच्या घशात जाऊ लागल्याने स्थानिक नागरिकांना या ठिकाणी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.महाबळेश्वरच्याच धर्तीवर २००३ मध्ये राज्य शासनाने सर्वप्रथम ‘नवीन महाबळेश्वर’ गिरिस्थान प्रकल्पाची घोषणा केली. त्यास काही स्थानिक नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञांकडून विरोध होऊ लागला. त्यामुळे २००४ मध्ये बासनात गुंडाळला गेला. परंतु, प्रकल्प पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा शासनाने निर्णय घेत राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २०११ मध्ये नियुक्ती केली होती. परंतु, प्रत्यक्ष प्रकल्पाची घोषणा मे २०२४ मध्ये करण्यात आली.नव्याने जाहीर केलेल्या प्रकल्पात सातारा, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील तब्बल २३५ गावांचा समावेश केला. यात सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील १७, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावे प्रकल्पात असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख १५ हजार ३३०.२४ हेक्टर क्षेत्र प्रकल्पात जाणार आहे. यानंतर आणखी २९४ गावे समाविष्ट करण्यात आल्याने एकूण गावांची संख्या ५२९ झाली.

'जमीनधारणां'चे तीनतेरा..नवीन महाबळेश्वर प्रकल्पास गती आल्यानंतर या ठिकाणच्या जागांचे भाव वाढू लागले. मुंबई व पुण्यातील अनेक बड्या धेंडांनी या ठिकाणी अगाेदरपासूनच शेकडो एकर जमिनींची खरेदी केली आहे. यात कमाल जमीन धारणा कायदा धाब्यावर बसवला आहे. 

युवकांना हवी संधी..नवीन महाबळेश्वर प्रकल्पात स्थानिक युवकांना उद्योजक बनण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याच जमिनीवर परप्रांतीयांचे उद्योग वाढणार अन् त्या ठिकाणी भूमिपुत्र कामगार, असे चित्र निर्माण होऊ शकते. याबाबत महाबळेश्वर तालुक्यात काही प्रमाणात जागृती होत आहे.

एकजूट गरजेचीप्रकल्पातील काही गावांमध्ये आपली जमीन ही गावातील माणसालाच विकण्याचा नवीन विचार मांडला जात आहे. मात्र, यासाठी गावाची एकजूट गरजेची आहे. कारण, अनेक वर्षे परगावी असणारे किंवा अडचणीत असणाऱ्या जमीन मालकांची इत्थंभूत माहिती देणारे एजंटांचे हस्तक गावातीलच असतात. गावातच योग्य मोबदला मिळाल्यास संपूर्ण गावाची जमीन विकली जाणार नाही.

सर्वाधिक दस्त पाटणमध्ये..जावली तालुका : आंबेघर तर्फ मेढा येथे २८.७१, भणंग येथे ३ कोटी २२ लाख ३१ हजारांचे गहाणखत तर माेहाट येथे ८३ लाख ८० हजार ५०० रुपयांचे व्यवहार झाले आहेत.पाटण तालुका : तालुक्यात १७२ दस्त झाले असून विहे, येरफळे, निवडे, मारुल हवेली, मुरुड, म्हावशी गावात जास्त व्यवहार आहेत. जवळपास ३० कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, यापोटी शासनाला १.५१ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.सातारा : यवतेश्वर, पाटेघर, परळी, चिंचणी, धावडशी, कामथी तर्फे सातारा, आंबवडे बुद्रुक, आगुंडेवाडी, करंजेतर्फ परळीत व्यवहार झालेले आहेत. व्यवहार रेडिरेकनरनुसार असले तरी प्रत्यक्षात खरेदी-विक्री बाजारभावानुसार झालेली आहे.

लोकांच्या डोळ्यांसमोर मुळशी पॅटर्न चित्रपटाचे उदाहरण आहे. त्यामुळे लाेकांनी तात्पुरता फायदा पाहायचा की पुढील पिढ्यांसाठी दूरदृष्टीने निर्णय घ्यायचा, हे त्यांच्याच हातात आहे. गावोगावी गावाबाहेरील व्यक्तींना जमीन विकू नये, असे ठराव व्हावेत. - डॉ. कुलदीप यादव, महाबळेश्वर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)