शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:12 PM

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. ...

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यामधील १९८ गावांनी तब्बल ५० दिवस घाम गाळून श्रमदान करत लाखो घनमीटरचे जलसंधारणाचे काम केले. त्यानंतर पडलेल्या पहिल्याच पावसात केलेल्या पाणलोटच्या कामामुळे शिवारातील समतल चर, ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.राज्यात दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळ पडल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर वणवण करावी लागते. तर जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ येते. त्यानंतर प्रशासन जागे होऊन टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची धडपड करत असते. या दुष्काळी चक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी चार वर्षांपूर्वी अभिनेता अमीर खान याने पाणी फाउंडेशनची सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली अनेक गावे टँकरमुक्त होऊन जलयुक्त झाली.यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातील अनेक गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील १९८ गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या निमित्ताने पाण्याबाबत साक्षरता होऊन पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवण्याचा दुष्काळग्रस्तांनी निर्धार केला. त्यासाठी अडीच वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वच जण हातात टिकाव, खोºयाच्या साह्याने शिवारात पाणी साठवण भांडी तयार करण्यासाठी घाम गाळला. अनेक वर्षांपासून राजकारण, निवडणुकीतील गट-तटांमुळे दुंभगलेली मन एकत्र आली. विद्यार्थी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक, महिल आणि वृद्धांनी एकमेकांच्या मदतीने सलग ५० दिवस श्रमदान केले.श्रमदान आणि मशीनद्वारे गावोगावी हजारो घनमीटर पाणी क्षमतेची जलसंधारणाची कामे झाली. स्पर्धा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. त्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणलोट विकासाच्या कामांमध्ये पाणी साठले आहे. वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवल्यामुळे ते जमिनीत मुरले. पहिल्याच पावसात कोरड्या पडलेल्या कूपनलिका व विहिरी काटोकाट भरल्याने श्रमकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.वृक्षारोपणासाठी पुढाकारवॉटर कप स्पर्धेच्या काळात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाचे काम करण्यात आले. तसेच स्पर्धेचा भाग असलेल्या वृक्षारोपणासाठी उन्हाळ्यात खड्डे खणले होते. पाऊस पडल्याने शिवारात पाणी उपलब्ध झाले. त्या खणलेल्या खड्ड्यांमध्ये गावोगावी वृक्षारोपण करण्याची जोरात सुरुवात झाली आहे.