शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

प्रशासनाने वारकऱ्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नये : अक्षय महाराज भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST

दहिवडी : आषाढी, कार्तिकी वारीदरम्यान वारकरी संप्रदायाने समन्वयाची भूमिका घेऊन शासन निर्णयाचे स्वागतच केले; पण माघ वारीदरम्यान प्रशासनाने पंढरी ...

दहिवडी : आषाढी, कार्तिकी वारीदरम्यान वारकरी संप्रदायाने समन्वयाची भूमिका घेऊन शासन निर्णयाचे स्वागतच केले; पण माघ वारीदरम्यान प्रशासनाने पंढरी क्षेत्रात मठात जाऊन जी धरपकड सुरू केली आहे. प्रशासनाचे हे कृत्य अतिशय संतापजनक असून प्रशासनाने वारकरी संप्रदायाच्या उद्रेकाची वाट पाहू नये, असा इशारा वारकरी संप्रदाय युवा मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केले.

बिजवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अक्षय महाराज भोसले म्हणाले, ‘दरवर्षी माघ वारीला लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला येतात. मात्र, कोरोनाचे संकट पाहता दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, हे आम्हालाही मान्य आहे; पण शासनाला नियमांची अंमलबजावणी करायची असेल तर त्या नियमांची स्वतः जाणीव करून घ्यावी व नियम पाळण्याची सुरुवात स्वतःपासून करावी. संतांजवळ मर्यादेने वागले पाहिजे, याची शिकवण प्रशासनास देण्याची आवश्यकता आहे. जे वारकरी बांधव अत्यंतिक निष्ठेने आपला आचारधर्म, संप्रदाय नियमावली सांभाळत आहेत ते तो मोडला जाऊ नये म्हणून पंढरीक्षेत्रात वास करीत आहेत. कोरोनाची एवढी भीती आहे तर वारीआधी दोन महिने ती काळजी घेणे गरजेचे होते. प्रत्येक मठात जाऊन वारकऱ्यांना पंढरीबाहेर काढत आहेत, ही गोष्ट लाजीरवाणी आहे.’