शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Satara: बोरगावजवळ सहलीच्या ‘बर्निंग बस’चा थरार; चालक, शिक्षकांच्या प्रसंगावधानाने मुले सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:44 IST

बसने रात्रीच्या एकच्या सुमारास अचानक पेट घेतला

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) हद्दीत पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या शालेय सहलीच्या बसने रात्रीच्या एकच्या सुमारास अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी रात्री एकच्या दरम्यान घडली. यावेळी बसचालक व शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला.याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर आगाराची बस (क्रमांक एमएच- ११, टी- ९२८६) शालेय सहल घेऊन गेली होती. बसमध्ये विद्यामंदिर गोगवे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या प्राथमिक शाळेतील तिसरी ते सहावीमधील ५० विद्यार्थी होते.शैक्षणिक सहल परतीच्या प्रवासाला असताना बोरगाव गावच्या हद्दीत रात्री एकच्या सुमारास बस आली असता तांत्रिक बिघाडाने बसने अचानक पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून शिक्षकांच्या मदतीने मुलांना सुखरूप बाहेर काढले; मात्र मुलांचे साहित्य हे एसटीसहित जळून खाक झाले. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ बोरगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी लगेच सातारा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबला पाचारण करून आग नियंत्रणात आणण्यात यश मिळविले; परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. यामध्ये विद्यार्थ्यांचे साहित्यही जळाले. काहीकाळ वाहतूक सेवारस्ता मार्गे पोलिसांनी वळविली होती. बसमधील सहलीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या एसटी बसने पाठविण्यात आले. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगStudentविद्यार्थी