शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Satara: मलकापुरात महामार्गावरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:28 IST

महामार्गाच्या कामातील चौथा बळी : अवजड वाहने उपमार्गावर; दोन्ही रस्त्याला भेगा

मलकापूर : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून अवजड वाहतुकीने उपमार्गाला खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांत अपघात होऊन आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या अपघातात खड्डा चुकविण्याच्या नादात गाडी घसरून महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्याने महिलेचा बळी घेतला, अशी चर्चा परिसरात होती.महामार्गाच्या सहापदरीकरणासह उड्डाणपुलाचे काम सुरू नसल्यामुळे एक वर्षापासून महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंच्या उपमार्गावरून वळविण्यात आली आहे. अवजड वाहतूक उपमार्गावरून होत असल्याने दोन्ही उपमार्गाला भेगा पडल्या आहेत. कोयना पूल ते नांदलापूर परिसरात ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध कामांसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे सुरुवातीला एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर काही दिवसांतच खड्ड्यात आपटून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होती. त्यानंतर ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होत. असे आतापर्यंत वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पुन्हा एकदा खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. त्यामुळे महामार्गावर खड्ड्यांनी आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. सध्या पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या उपमार्गावर खड्डे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. नेमका रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता हे कळेना, अशी अवस्था मलकापुरात झाली आहे. वेळोवेळी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणा तोकडी पडत असे. या खड्ड्यांतून मार्ग काढत असताना अवजड वाहतुकीसह दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत असे. खड्ड्यांमध्ये वाहने आढळून अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला. तर वाहनांचा मेंटेनन्सही वाढला असल्याचे वाहनधारकांमधून बोलले जात आहे. तरी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

खड्ड्यांत पाणी.. मणक्याला दणका!नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे उपमार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाची पाणी साचत आहे. वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्याने अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहेत. अनेकवेळा सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाड्या बंद पडून गाड्यांचे नुकसान झाले आहे. दररोजच वाहतूक संथगतीने सुरू असते. तर वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा चार किलोमीटरपर्यंत रांगांमध्ये वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे.

जागोजागची अपुरी कामे जीवघेणी..मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडून ठिकाणी वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्या कामात ठिकठिकाणी अपुरे कामे करून तसेच सोडून दुसरीकडेच काम सुरू केले जाते. त्यामुळे अशी अपुरी सोडलेली कामे वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गDeathमृत्यू