शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

Satara: मलकापुरात महामार्गावरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:28 IST

महामार्गाच्या कामातील चौथा बळी : अवजड वाहने उपमार्गावर; दोन्ही रस्त्याला भेगा

मलकापूर : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून अवजड वाहतुकीने उपमार्गाला खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांत अपघात होऊन आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या अपघातात खड्डा चुकविण्याच्या नादात गाडी घसरून महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्याने महिलेचा बळी घेतला, अशी चर्चा परिसरात होती.महामार्गाच्या सहापदरीकरणासह उड्डाणपुलाचे काम सुरू नसल्यामुळे एक वर्षापासून महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंच्या उपमार्गावरून वळविण्यात आली आहे. अवजड वाहतूक उपमार्गावरून होत असल्याने दोन्ही उपमार्गाला भेगा पडल्या आहेत. कोयना पूल ते नांदलापूर परिसरात ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध कामांसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे सुरुवातीला एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर काही दिवसांतच खड्ड्यात आपटून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होती. त्यानंतर ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होत. असे आतापर्यंत वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पुन्हा एकदा खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. त्यामुळे महामार्गावर खड्ड्यांनी आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. सध्या पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या उपमार्गावर खड्डे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. नेमका रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता हे कळेना, अशी अवस्था मलकापुरात झाली आहे. वेळोवेळी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणा तोकडी पडत असे. या खड्ड्यांतून मार्ग काढत असताना अवजड वाहतुकीसह दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत असे. खड्ड्यांमध्ये वाहने आढळून अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला. तर वाहनांचा मेंटेनन्सही वाढला असल्याचे वाहनधारकांमधून बोलले जात आहे. तरी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

खड्ड्यांत पाणी.. मणक्याला दणका!नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे उपमार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाची पाणी साचत आहे. वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्याने अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहेत. अनेकवेळा सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाड्या बंद पडून गाड्यांचे नुकसान झाले आहे. दररोजच वाहतूक संथगतीने सुरू असते. तर वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा चार किलोमीटरपर्यंत रांगांमध्ये वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे.

जागोजागची अपुरी कामे जीवघेणी..मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडून ठिकाणी वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्या कामात ठिकठिकाणी अपुरे कामे करून तसेच सोडून दुसरीकडेच काम सुरू केले जाते. त्यामुळे अशी अपुरी सोडलेली कामे वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गDeathमृत्यू