शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले

By दत्ता यादव | Updated: March 5, 2025 14:01 IST

आनेवाडी टोलनाक्याजवळील घटना

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी, ता. जावळी टोलनाक्यापासून जवळच मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवून ३२ मुला-मुलींना तातडीने बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आयआयटीमध्ये शिक्षण घेणारी ३२ मुले आणि मुली लक्झरी बसने साताऱ्याकडे यायला निघाली. ही मुले सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील सुझलाॅन कंपनीत प्रोजेक्टसाठी येत होती. आनेवाडी टोलनाक्यापासून काही अंतर पुढे आल्यानंतर बसच्या पाठीमागील भागात आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.यानंतर चालकाने बस सेवारस्त्यावर वळवली. तातडीने मुला-मुलींना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. बसला अचानक आग लागल्याने मुले भयभीत झाली. हातात येतील तशा बॅगा व इतर साहित्य घेऊन मुले काही मिनिटांतच बसमधून खाली उतरली. काही नागरिकांनी तातडीने या घटनेची अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

या आगीत बसमधील सीट जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास धस आणि भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या आयआयटीच्या मुलांसाठी दुसरी लक्झरी बस उपलब्ध करून दिली. त्यानंतर मुले चाळकेवाडीकडे आपल्या प्रोजेक्टसाठी रवाना झाली. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIIT Mumbaiआयआयटी मुंबईStudentविद्यार्थीfireआग