शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कोयना नव्वदी पार, धरण भरण्यासाठी हवे १५ टीएमसी; सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:02 IST

२४ तासांत नवजालाच १९ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाची विश्रांती असून, २४ तासांत नवजा येथेच सर्वाधिक १९ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणातील पाण्याची आवकही घटली आहे. तरीही कोयना धरणातील पाणीसाठ्याने ९० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे.जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला हाेता. त्यामुळे पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणात पाणी येण्यास सुरुवात झालेली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला नव्हता. तर पूर्व भागात दमदार पाऊस झाल्याने छोट्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला होता. यामुळे दुष्काळाची स्थिती निवळली. पण, जुलै महिना उजाडल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. जुलैच्या मध्यावर सुरू झालेला पाऊस महिना संपेपर्यंत सुरूच होता. या काळात पश्चिमेकडील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात अतिवृष्टी होती. जवळपास १२ दिवस पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या अतिवृष्टीमुळे छोटे पाणी प्रकल्प भरून वाहिले. तर कोयनेसह प्रमुख मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही धरणे ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान भरली आहेत. त्यामुळे धरणाबद्दलची चिंता कमी झाली आहे. अजूनही पावसाचा दीड महिना बाकी आहे. त्यामुळे धरणे भरू शकतात. पण, ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाची उघडीप आहे.जिल्ह्यात मागील १२ दिवसात कमी पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून तर उघडीप आहे. पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९, नवजाला १९ आणि महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटर पर्जन्यमनाची नोंद झाली आहे. पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातही सावकाश आवक आहे. सकाळच्या सुमारास सुमारे साडेसात हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ९०.१४ टीएमसी झाला आहे. पाऊस कमी झाल्यापासून कोयनेतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

नवजाला ५,०७४ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. १ जूनपासून नवजा येथे ५ हजार ७४ मिलिमीटरची नोंद झाली, तर कोयनानगरला ४ हजार २८० आणि महाबळेश्वरमध्ये ४ हजार ८३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी नवजाचा पाऊस सहा हजारांपर्यंत, तर महाबळेश्वरला पाच हजार मिलिमीटरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस