शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

प्रमुख धरणांमध्ये १२५ टीएमसी पाणीसाठा : उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:05 IST

पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम

ठळक मुद्दे गतवर्षीपेक्षा १७ टीएमसी अधिक

सातारा : जिल्'ात गेल्यावर्षी सतत पाच महिने झालेल्या पावसामुळे आजही सर्वच धरणात चांगला पाणीसाठा आहे. त्यातच अजूनही सिंचनासाठी मोठा पाणी वापर सुरू नाही. तर जिल्'ातील प्रमुख सहा धरणांची साठवण क्षमता १४८.७४ टीमएसी आहे. सद्य:स्थितीत या धरणातील साठा १२५.३५ टीएमसी आहे. हा साठा गतवर्षीपेक्षा जवळपास १७ टीएमसीने अधिक आहे. तर उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार आहे.जिल्'ात २०१८ या वर्षात दुष्काळी स्थिती होती.

पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम म्हणून धरणातील साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे २०१९ मध्ये तरी पाऊस होणार का? अशी चिंता लागलेली. पण पावसाने धुवाँधार सुरुवात केली. पश्चिम भागात तर जुलैपासून सतत पाऊस राहिला. हा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे दोनवेळा जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली. कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. याचदरम्यान, पश्चिम भागातील सर्वच धरणे भरली होती. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत होता. परिणामी नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या.

पूर्व भागात खऱ्या अर्थाने आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. सुरुवातीला परतीचा पाऊस दमदार कोसळला. तर त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला अवकाळीने कहरच केला. यामुळे शेती पिके, फळबागा, घरांचे मोठे नुकसान झाले. नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही लांबल्या. अशा या पार्श्वभूमिवर जिल्'ात अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी नाही. त्यामुळे धरणात चांगला पाणीसाठा टिकून आहे.जिल्'ातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी या धरणात १०८.४३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो १५ जानेवारीला १२५.३५ टीएमसी इतका आहे. म्हणजेच सततच्या पावसामुळे पाणीसाठा टिकून असून, गतवर्षीपेक्षा तो १७ टीएमसीने अधिक आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाºया कोयना धरणातही अजून ८५.९० टीएमसी साठा आहे. तर धोम, कण्हेर, बलकवडी, उरमोडी आणि येरळवाडीतही चांगला पाणीसाठा आहे. सध्या कण्हेर धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू करण्यात आला आहे.उन्हाळा सुरू झाल्यानंतर पिकांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येते. त्यासाठी कण्हेर, उरमोडी, कोयना, धोम अशा सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. सध्या पाणीसाठा चांगला असल्याने शेतीसाठी टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे.जिल्'ातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे यावर्षी गतवर्षी एकूण क्षमताधोम ११.०७ ७.७५ १३.५०कण्हेर ८.६९ ७.५५ १०.१०कोयना ८५.९० ८०.१६ १०५.२५बलकवडी ४.०३ २.०६ ४.०८उरमोडी ९.७७ ५.१८ ९.९६तारळी ४.७६ ४.६८ ५.८५येरळवाडी १.१३ ०.५१ १.१५....................................................

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण