शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

प्रमुख धरणांमध्ये १२५ टीएमसी पाणीसाठा : उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:05 IST

पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम

ठळक मुद्दे गतवर्षीपेक्षा १७ टीएमसी अधिक

सातारा : जिल्'ात गेल्यावर्षी सतत पाच महिने झालेल्या पावसामुळे आजही सर्वच धरणात चांगला पाणीसाठा आहे. त्यातच अजूनही सिंचनासाठी मोठा पाणी वापर सुरू नाही. तर जिल्'ातील प्रमुख सहा धरणांची साठवण क्षमता १४८.७४ टीमएसी आहे. सद्य:स्थितीत या धरणातील साठा १२५.३५ टीएमसी आहे. हा साठा गतवर्षीपेक्षा जवळपास १७ टीएमसीने अधिक आहे. तर उन्हाळ्यात सिंचनासाठी विसर्ग वाढवावा लागणार आहे.जिल्'ात २०१८ या वर्षात दुष्काळी स्थिती होती.

पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम म्हणून धरणातील साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे २०१९ मध्ये तरी पाऊस होणार का? अशी चिंता लागलेली. पण पावसाने धुवाँधार सुरुवात केली. पश्चिम भागात तर जुलैपासून सतत पाऊस राहिला. हा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे दोनवेळा जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली. कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. याचदरम्यान, पश्चिम भागातील सर्वच धरणे भरली होती. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत होता. परिणामी नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या.

पूर्व भागात खऱ्या अर्थाने आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. सुरुवातीला परतीचा पाऊस दमदार कोसळला. तर त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला अवकाळीने कहरच केला. यामुळे शेती पिके, फळबागा, घरांचे मोठे नुकसान झाले. नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही लांबल्या. अशा या पार्श्वभूमिवर जिल्'ात अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी नाही. त्यामुळे धरणात चांगला पाणीसाठा टिकून आहे.जिल्'ातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी या धरणात १०८.४३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो १५ जानेवारीला १२५.३५ टीएमसी इतका आहे. म्हणजेच सततच्या पावसामुळे पाणीसाठा टिकून असून, गतवर्षीपेक्षा तो १७ टीएमसीने अधिक आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाºया कोयना धरणातही अजून ८५.९० टीएमसी साठा आहे. तर धोम, कण्हेर, बलकवडी, उरमोडी आणि येरळवाडीतही चांगला पाणीसाठा आहे. सध्या कण्हेर धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू करण्यात आला आहे.उन्हाळा सुरू झाल्यानंतर पिकांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येते. त्यासाठी कण्हेर, उरमोडी, कोयना, धोम अशा सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. सध्या पाणीसाठा चांगला असल्याने शेतीसाठी टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे.जिल्'ातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे यावर्षी गतवर्षी एकूण क्षमताधोम ११.०७ ७.७५ १३.५०कण्हेर ८.६९ ७.५५ १०.१०कोयना ८५.९० ८०.१६ १०५.२५बलकवडी ४.०३ २.०६ ४.०८उरमोडी ९.७७ ५.१८ ९.९६तारळी ४.७६ ४.६८ ५.८५येरळवाडी १.१३ ०.५१ १.१५....................................................

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण