शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

जिल्ह्यात २६ हजार चाचण्यात ६२९५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एप्रिल महिन्यातील पहिल्या १० दिवसांत तब्बल २६ हजार संशयितांची ...

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एप्रिल महिन्यातील पहिल्या १० दिवसांत तब्बल २६ हजार संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ६ हजार २९५ रुग्ण बाधित आढळले. तर ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकट सुरू झाले आहे. सुरूवातीला कमी प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे महिन्यानंतर रुग्णसंख्या हळू हळू वाढू लागली. तर जून महिन्याच्या उत्तरार्धापासून शेकडोच्या पटीत बाधित आढळू लागले. यानंतरच जिल्ह्यात खºयाअर्थाने कोरोना कहर सुरू झाला. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाचा कहर मोठा होता. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावरही कोरोना बाधित सापडू लागले. यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३८ हजारांवर गेला होता. तसेच मृत्यमुखी पडणाºयांचीही संख्या वाढली. असे असलेतरी आॅक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

नोव्हेंबर महिना दिलासादायक ठरला. आॅक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले. तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असलेतरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते. जानेवारीपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारी सुरू होताच बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. तर कोरोनामुक्त कमी झाले. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढला.

मार्चमध्ये कोरोनाचे ६ हजार ५४८ रुग्ण आढळले. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. १५ ने मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढली. तर १ हजार २२३ जण कोरोना मुक्त झाले. असे असलेतरी एप्रिलमधील पहिल्या १० दिवसांत तब्बल ६ हजार २९५ रुग्ण वाढले. तर जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजारांवर बाधित सापडले आहेत. मृतांचा आकडा १ हजार ९६४ वर पोहोचला असून यामधील ५४ बळी हे या दिवसांतील आहेत. त्याचबरोबर एप्रिलमध्ये १० तारखेपर्यंत २६ हजारांहून अधिक संशयितांची कोरोना चाचणी झाली आहे. ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक ठरत आहे.

चौकट :

कोरोनामुक्तांचा आकडा ६३ हजारांवर...

जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापासून कोरोना बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मृत्यमुखी पडणाºयांचाही आकडाही सतत वाढत आहे. बाधितांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाºयांची संख्या कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६३ हजार ३३५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यामधील २ हजार ९७४ जण हे एप्रिलमध्ये बरे झाले आहेत.

...............