शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात २६ हजार चाचण्यात ६२९५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एप्रिल महिन्यातील पहिल्या १० दिवसांत तब्बल २६ हजार संशयितांची ...

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एप्रिल महिन्यातील पहिल्या १० दिवसांत तब्बल २६ हजार संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ६ हजार २९५ रुग्ण बाधित आढळले. तर ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकट सुरू झाले आहे. सुरूवातीला कमी प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे महिन्यानंतर रुग्णसंख्या हळू हळू वाढू लागली. तर जून महिन्याच्या उत्तरार्धापासून शेकडोच्या पटीत बाधित आढळू लागले. यानंतरच जिल्ह्यात खºयाअर्थाने कोरोना कहर सुरू झाला. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाचा कहर मोठा होता. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावरही कोरोना बाधित सापडू लागले. यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३८ हजारांवर गेला होता. तसेच मृत्यमुखी पडणाºयांचीही संख्या वाढली. असे असलेतरी आॅक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

नोव्हेंबर महिना दिलासादायक ठरला. आॅक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले. तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असलेतरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते. जानेवारीपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारी सुरू होताच बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. तर कोरोनामुक्त कमी झाले. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढला.

मार्चमध्ये कोरोनाचे ६ हजार ५४८ रुग्ण आढळले. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. १५ ने मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढली. तर १ हजार २२३ जण कोरोना मुक्त झाले. असे असलेतरी एप्रिलमधील पहिल्या १० दिवसांत तब्बल ६ हजार २९५ रुग्ण वाढले. तर जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजारांवर बाधित सापडले आहेत. मृतांचा आकडा १ हजार ९६४ वर पोहोचला असून यामधील ५४ बळी हे या दिवसांतील आहेत. त्याचबरोबर एप्रिलमध्ये १० तारखेपर्यंत २६ हजारांहून अधिक संशयितांची कोरोना चाचणी झाली आहे. ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक ठरत आहे.

चौकट :

कोरोनामुक्तांचा आकडा ६३ हजारांवर...

जिल्ह्यात मागील अडीच महिन्यापासून कोरोना बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मृत्यमुखी पडणाºयांचाही आकडाही सतत वाढत आहे. बाधितांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाºयांची संख्या कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६३ हजार ३३५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यामधील २ हजार ९७४ जण हे एप्रिलमध्ये बरे झाले आहेत.

...............